शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

उरीमधील हल्ला पाकच्या वैफल्यातून : अमित शहा

By admin | Updated: September 26, 2016 00:41 IST

घुसखोरीचे १७ प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानने वैफल्यातून उरीचा दहशतवादी हल्ला घडवून आणला.

कोझिकोड : घुसखोरीचे १७ प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानने वैफल्यातून उरीचा दहशतवादी हल्ला घडवून आणला. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानकडून थोपल्या गेलेल्या युद्धाचाच एक भाग आहे, असे सांगतानाच यात अंतिम विजय भारताचाच होईल, असा विश्वासही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटनाच्या भाषणात बोलताना शहा म्हणाले की, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देश तयार आहे. तथापि, उरी हल्ल्यानंतर देशात जो संताप आहे त्याला आम्ही समजू शकतो, असे सांगून शहा म्हणाले की, दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, हे केंद्र सरकार आणि भाजपचे धोरण आहे. दहशतवादाच्या अशा प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गत आठ महिन्यात ११७ दहशतवादी मारले गेले आहेत. कारण, सरकारने दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई सुरु केलेली आहे. अमित शहा म्हणाले की, दहशतवाद्यांनी गत आठ महिन्यात घुसखोरीचे १७ प्रयत्न केले आहेत. पण, आमच्या वीर जवानांनी हे प्रयत्न हाणून पाडले. या वैफल्यातूनच उरी हल्ला झाला. आमच्या शेजारी देशाने लादलेले हे दीर्घ युद्ध आहे. उरी हल्ला याचाच एक भाग आहे. पण, हा अंतिम परिणाम नाही. अंतिम विजय आमचाच होणार आहे. या हल्ल्यातील दोषींना शिक्षा करण्याचा शब्द मोदी यांनी दिला आहे, याचा उल्लेखही शहा यांनी केला. दरम्यान, पाकिस्तानकडून अतिरेकी बुऱ्हान वाणी याचा उल्लेख शांतिप्रिय युवक असा केला गेल्याने जगही अचंबित झाले आहे. तर पाकिस्तान दहशतवादाशी कसे जोडले गेलेले आहे, याचाही हा पुरावा आहे. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे, असेही ते म्हणाले.