शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

उरीमधील हल्ला पाकच्या वैफल्यातून : अमित शहा

By admin | Updated: September 26, 2016 00:41 IST

घुसखोरीचे १७ प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानने वैफल्यातून उरीचा दहशतवादी हल्ला घडवून आणला.

कोझिकोड : घुसखोरीचे १७ प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानने वैफल्यातून उरीचा दहशतवादी हल्ला घडवून आणला. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानकडून थोपल्या गेलेल्या युद्धाचाच एक भाग आहे, असे सांगतानाच यात अंतिम विजय भारताचाच होईल, असा विश्वासही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटनाच्या भाषणात बोलताना शहा म्हणाले की, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देश तयार आहे. तथापि, उरी हल्ल्यानंतर देशात जो संताप आहे त्याला आम्ही समजू शकतो, असे सांगून शहा म्हणाले की, दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, हे केंद्र सरकार आणि भाजपचे धोरण आहे. दहशतवादाच्या अशा प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गत आठ महिन्यात ११७ दहशतवादी मारले गेले आहेत. कारण, सरकारने दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई सुरु केलेली आहे. अमित शहा म्हणाले की, दहशतवाद्यांनी गत आठ महिन्यात घुसखोरीचे १७ प्रयत्न केले आहेत. पण, आमच्या वीर जवानांनी हे प्रयत्न हाणून पाडले. या वैफल्यातूनच उरी हल्ला झाला. आमच्या शेजारी देशाने लादलेले हे दीर्घ युद्ध आहे. उरी हल्ला याचाच एक भाग आहे. पण, हा अंतिम परिणाम नाही. अंतिम विजय आमचाच होणार आहे. या हल्ल्यातील दोषींना शिक्षा करण्याचा शब्द मोदी यांनी दिला आहे, याचा उल्लेखही शहा यांनी केला. दरम्यान, पाकिस्तानकडून अतिरेकी बुऱ्हान वाणी याचा उल्लेख शांतिप्रिय युवक असा केला गेल्याने जगही अचंबित झाले आहे. तर पाकिस्तान दहशतवादाशी कसे जोडले गेलेले आहे, याचाही हा पुरावा आहे. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे, असेही ते म्हणाले.