शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

उरीमधील हल्ला पाकच्या वैफल्यातून : अमित शहा

By admin | Updated: September 26, 2016 00:41 IST

घुसखोरीचे १७ प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानने वैफल्यातून उरीचा दहशतवादी हल्ला घडवून आणला.

कोझिकोड : घुसखोरीचे १७ प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानने वैफल्यातून उरीचा दहशतवादी हल्ला घडवून आणला. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानकडून थोपल्या गेलेल्या युद्धाचाच एक भाग आहे, असे सांगतानाच यात अंतिम विजय भारताचाच होईल, असा विश्वासही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटनाच्या भाषणात बोलताना शहा म्हणाले की, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देश तयार आहे. तथापि, उरी हल्ल्यानंतर देशात जो संताप आहे त्याला आम्ही समजू शकतो, असे सांगून शहा म्हणाले की, दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, हे केंद्र सरकार आणि भाजपचे धोरण आहे. दहशतवादाच्या अशा प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गत आठ महिन्यात ११७ दहशतवादी मारले गेले आहेत. कारण, सरकारने दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई सुरु केलेली आहे. अमित शहा म्हणाले की, दहशतवाद्यांनी गत आठ महिन्यात घुसखोरीचे १७ प्रयत्न केले आहेत. पण, आमच्या वीर जवानांनी हे प्रयत्न हाणून पाडले. या वैफल्यातूनच उरी हल्ला झाला. आमच्या शेजारी देशाने लादलेले हे दीर्घ युद्ध आहे. उरी हल्ला याचाच एक भाग आहे. पण, हा अंतिम परिणाम नाही. अंतिम विजय आमचाच होणार आहे. या हल्ल्यातील दोषींना शिक्षा करण्याचा शब्द मोदी यांनी दिला आहे, याचा उल्लेखही शहा यांनी केला. दरम्यान, पाकिस्तानकडून अतिरेकी बुऱ्हान वाणी याचा उल्लेख शांतिप्रिय युवक असा केला गेल्याने जगही अचंबित झाले आहे. तर पाकिस्तान दहशतवादाशी कसे जोडले गेलेले आहे, याचाही हा पुरावा आहे. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे, असेही ते म्हणाले.