शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

अमरनाथ यात्रेला अतिरेक्यांचा धोका

By admin | Updated: June 29, 2016 06:08 IST

अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.

नबीन सिन्हा,

नवी दिल्ली- ऐतिहासिक अमरनाथ यात्रा २ जुलैपासून सुरू होत असून, अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.दोन महिने चालणाऱ्या या यात्रेसंबंधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयानचर्चेच्या अनेक फेऱ्या चालविल्या आहेत. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गृहसचिव राजीव महर्षी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावत सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. दररोज ७५०० यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार असून, दोन दिवसांत हजारावर यात्रेकरू परतीची वाट धरतील.गेल्या १० दिवसांतील घडामोडी विशेषत: सुरक्षा दलावर अतिरेक्यांनी केलेला हल्ला गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. खरे तर अनंतनाग आणि पाम्पोर येथे सीआरपीएफच्या पथकावर झालेले हल्ले सुरक्षा दलासाठी आव्हान ठरले आहेत.>नॉर्थ ब्लॉकला विशेष नियंत्रण कक्ष...केंद्रीय गृहमंत्रालय असलेल्या दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून यात्रा मार्गांवर अनेक बुथ उभारले जातील. संपूर्ण भागात विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अतिरेक्यांचे हब असलेल्या दक्षिण काश्मीरमधून यात्रामार्ग जात असल्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना रात्री जागून काढाव्या लागतील. पोलिसांनी जम्मूलगतच्या राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालण्यावर लक्ष केंद्रित केले आहे..