शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

अमरनाथ यात्रेला अतिरेक्यांचा धोका

By admin | Updated: June 29, 2016 06:08 IST

अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.

नबीन सिन्हा,

नवी दिल्ली- ऐतिहासिक अमरनाथ यात्रा २ जुलैपासून सुरू होत असून, अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.दोन महिने चालणाऱ्या या यात्रेसंबंधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयानचर्चेच्या अनेक फेऱ्या चालविल्या आहेत. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गृहसचिव राजीव महर्षी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावत सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. दररोज ७५०० यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार असून, दोन दिवसांत हजारावर यात्रेकरू परतीची वाट धरतील.गेल्या १० दिवसांतील घडामोडी विशेषत: सुरक्षा दलावर अतिरेक्यांनी केलेला हल्ला गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. खरे तर अनंतनाग आणि पाम्पोर येथे सीआरपीएफच्या पथकावर झालेले हल्ले सुरक्षा दलासाठी आव्हान ठरले आहेत.>नॉर्थ ब्लॉकला विशेष नियंत्रण कक्ष...केंद्रीय गृहमंत्रालय असलेल्या दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून यात्रा मार्गांवर अनेक बुथ उभारले जातील. संपूर्ण भागात विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अतिरेक्यांचे हब असलेल्या दक्षिण काश्मीरमधून यात्रामार्ग जात असल्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना रात्री जागून काढाव्या लागतील. पोलिसांनी जम्मूलगतच्या राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालण्यावर लक्ष केंद्रित केले आहे..