शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

अमरनाथ यात्रा, गुप्तचर यंत्रणांनी 15 दिवसांपूर्वीच दिला होता हल्ल्याचा इशारा

By admin | Updated: July 12, 2017 09:18 IST

25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे बसमधील अमरनाथ अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला दहशतवादी रोखता येणं शक्य होतं. जर का बस निर्धारित वेळेत हायवेवरुन गेली असती तर कदाचित हा हल्ला झाला नसता. दुसरीकडे गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती आणि इशा-याकडे गंभीरतेने पाहिलं असतं तरी हा हल्ला टाळता आला असता. जवळपास 15 दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला अमरनाथ यात्रेला धोका असल्याचा अलर्ट दिला होता. संध्याकाळच्या वेळेस बसेसची वाहतूक थांबवून हल्ला टाळता येणं शक्य होतं. 25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंवर होणा-या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. 
 
आणखी बातम्या
 
अलर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, "अनंतनागच्या एसएसपींकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांकडून 100 ते 150 यात्रेकरु आणि जवळपास 100 पोलिसांची हत्या करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय यात्रेकरुंवर हल्ला करत धार्मिक तणाव वाढवण्याचाही कट आखला जाऊ शकतो. मिळालेल्या अलर्टनुसार ज्याप्रकारचे इनपूट मिळाले आहेत ते पाहता समन्वयाची गरज आहे. एखादा मोठा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. सुरक्षेसाठी तैनात सर्व अधिकारी आणि जवानांना अत्यंत अलर्ट राहण्याची आणि सावधानता बाळगण्याची गरज असल्याचा आदेश दिला गेला पाहिजे. दहशतवाद्यांनी हिंसा करण्यासाठी आखलेला कट मोडून काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले पाहिजेत".
 
जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या अधिका-यांना या अलर्टची माहिती देत सावध केलं होतं. अमरनाथ यात्रेसाठी याच राज्यांमधून सर्वात जास्त लोक सहभागी होत असतात. 
 
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
 
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
 
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. 
 
नियमांचे उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.
 
१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांड
अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.
 
मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृत पावलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या जास्त असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश आहे. उषा सोनकर आणि उर्मलाबेन ठाकोर अशी त्यांची नावे आहेत. या दोघीही पालघर येथील डहाणूच्या रहिवासी होत्या. जखमींमध्येही महाराष्ट्रातील आठ जणांचा सामवेश आहे.