शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट

By admin | Updated: June 6, 2017 08:58 IST

काश्मिरमध्ये सध्या सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा सैन्यदलासमोर अमरनाथ यात्रेचं आव्हान समोर उभं राहत आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 6- काश्मिरमध्ये सध्या सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा सैन्यदलासमोर अमरनाथ यात्रेचं आव्हान समोर उभं राहत आहे.  सध्यातरी अधिकृतपणे यात्रेच्या दरम्यान कोणताही धोका नसल्याचं बोललं जात आहे. पण जर सुरक्षा व्यवस्थेमध्ये जराही हलगर्जी झाली तर यात्रेवरसुद्धा दहशतवादी हल्ला होऊ शकतो , असं सुरक्षा दलाचं मत आहे. जम्मू-काश्मिर सरकारने अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गाला अतीसंवेदनशील घोषित केलं आहे. तसंच भाविकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशसुद्धा सरकारने सैन्य दलाला दिले आहेत. 
 
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मिर सरकारने महत्त्वाचे निर्देश काढले आहेत. लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 29 जूनपासून सुरू होणाऱ्या यात्रेच्या सुरक्षेची खात्री केली जाते आहे. तसंच गुप्तचर संस्था आणि एकिकृत मुख्यालयातून मिळणाऱे आदेश आणि माहिती याची चाचपणी करण्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे कुठल्याही संभाव्य दुर्घटनेला रोखता येइल. 
 
अमरनाथ यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी श्राइन बोर्डाकडून लाखो लोकांना निमंत्रण पाठविण्यात आलं आहे.आत्तापर्यंत दोन लाख लोकांची नोंदणी झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना सांभाळण्याचं आव्हान आता सैन्यदलासमोर आहे. याधी अनेक वेळा सैन्यदलाला धुत बनवत दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. 
 
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होते आहे. तर 7 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये तेरा वर्ष वयापेक्षा कमी आणि 75 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती सहभाग घेऊ शकणार नाही. तसंच गरोदर महिलांनासुद्धा यात्रेत सहभाग घेता येणार नाही. यंदाच्या यात्रेसाठी तब्बल 37 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. गेल्या यात्रेत भाविकांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं यंदा त्या गोष्टी घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. नोंदगी न करता यात्रेमध्ये भाविकांना सहभाग घेता येणार नाही.