शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ हल्ला: पहिली घोडचूक, भाविकांच्या बसचं रजिस्ट्रेशन नव्हतं

By admin | Updated: July 10, 2017 23:03 IST

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
अनंतनाग, दि. 10 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तसंच 13 जण जखमी झाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेच्या आधी 25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता. याशिवाय एक मोठी घोडचूक समोर आली आहे. गुजरातच्या ज्या बसवर दहशतवादी हल्ला झाला त्या बसची नोंदणी श्राइन बोर्डाकडे करण्यात आली नव्हती अशी माहिती समोर आली आहे.  
 
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू होण्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी  25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता.अमरनाथ यात्रेवर हल्ला करून देशभरात सांप्रदायिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न दहशतवादी करू शकतात. तसंच पोलीस आणि अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर लगेचच गुप्तचर यंत्रणांनी तसा अलर्ट जारी केला होता.    
 (जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार)
(काश्मीरमध्ये तिस-या दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरूच)
(दार्जिलिंगमध्ये जाळपोळ; गोळीबारात तिघांचा मृत्यू)
अमरनाथ यात्रेवर यंदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेण्यात आली असून भाविकांच्या केसालाही धक्का लागणार नाही असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतरही हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.   
 
दहशतवाद्यांनी हा हल्ला रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास केला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे याच जिल्ह्यातील बांतिगू परिसरात पोलिसांच्या पथकावर सुद्धा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यात तीन जवान जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
 
यापुर्वी 27 जुलै 2000 रोजी अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला होता. त्यामध्ये 25 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तर 37 यात्रेकरू जखमी झाले होते.