शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

अमरनाथ हल्ला: पहिली घोडचूक, भाविकांच्या बसचं रजिस्ट्रेशन नव्हतं

By admin | Updated: July 10, 2017 23:03 IST

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
अनंतनाग, दि. 10 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तसंच 13 जण जखमी झाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेच्या आधी 25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता. याशिवाय एक मोठी घोडचूक समोर आली आहे. गुजरातच्या ज्या बसवर दहशतवादी हल्ला झाला त्या बसची नोंदणी श्राइन बोर्डाकडे करण्यात आली नव्हती अशी माहिती समोर आली आहे.  
 
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू होण्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी  25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता.अमरनाथ यात्रेवर हल्ला करून देशभरात सांप्रदायिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न दहशतवादी करू शकतात. तसंच पोलीस आणि अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर लगेचच गुप्तचर यंत्रणांनी तसा अलर्ट जारी केला होता.    
 (जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार)
(काश्मीरमध्ये तिस-या दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरूच)
(दार्जिलिंगमध्ये जाळपोळ; गोळीबारात तिघांचा मृत्यू)
अमरनाथ यात्रेवर यंदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेण्यात आली असून भाविकांच्या केसालाही धक्का लागणार नाही असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतरही हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.   
 
दहशतवाद्यांनी हा हल्ला रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास केला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे याच जिल्ह्यातील बांतिगू परिसरात पोलिसांच्या पथकावर सुद्धा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यात तीन जवान जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
 
यापुर्वी 27 जुलै 2000 रोजी अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला होता. त्यामध्ये 25 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तर 37 यात्रेकरू जखमी झाले होते.