शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

"कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुलाची ईडी चौकशी थांबवण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले’’

By बाळकृष्ण परब | Updated: December 14, 2020 15:37 IST

Amarinder Singh News : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत. तर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी मुलावरील ईडीची केस मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले, असा आरोप केजरीवाल यांनी केला.पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठेवलेले उपोषण हे नाटक असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार आरोप केले. ईडीकडील केस माफ व्हावी यासाठी अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारसोबत सेटिंग केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की, कॅप्टनजी मी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसोबत आहे. मी दिल्लीतील स्टेडियमना जेलमध्ये परिवर्तीत होऊ दिलं नाही. केंद्र सरकारसोबत लढलो आहे. मी शेतकऱ्यांचा सेवेकरी बनून त्यांची सेवा करत आहे. तुम्ही तर तुमच्या मुलावरील ईडीची केस माफ व्हावी यासाठी केंद्र सरकारसोबत सेटिंग केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन विकले? पण का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घोषित केला होता. तसेच नागरिकांनाही उपोषण करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. अरविंद केजरीवाल यांचे उपोषण म्हणजे नाटक आहे, असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला होता. तसेच अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले एक काम सांगा, असे आव्हानही अमरिंदर सिंग यांनी दिले आहे. दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही काम करण्याऐवजी केजरीवाल आणि त्यांचा पक्ष राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाबAAPआप