शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

"कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुलाची ईडी चौकशी थांबवण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले’’

By बाळकृष्ण परब | Updated: December 14, 2020 15:37 IST

Amarinder Singh News : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत. तर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी मुलावरील ईडीची केस मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले, असा आरोप केजरीवाल यांनी केला.पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठेवलेले उपोषण हे नाटक असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार आरोप केले. ईडीकडील केस माफ व्हावी यासाठी अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारसोबत सेटिंग केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की, कॅप्टनजी मी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसोबत आहे. मी दिल्लीतील स्टेडियमना जेलमध्ये परिवर्तीत होऊ दिलं नाही. केंद्र सरकारसोबत लढलो आहे. मी शेतकऱ्यांचा सेवेकरी बनून त्यांची सेवा करत आहे. तुम्ही तर तुमच्या मुलावरील ईडीची केस माफ व्हावी यासाठी केंद्र सरकारसोबत सेटिंग केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन विकले? पण का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घोषित केला होता. तसेच नागरिकांनाही उपोषण करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. अरविंद केजरीवाल यांचे उपोषण म्हणजे नाटक आहे, असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला होता. तसेच अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले एक काम सांगा, असे आव्हानही अमरिंदर सिंग यांनी दिले आहे. दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही काम करण्याऐवजी केजरीवाल आणि त्यांचा पक्ष राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाबAAPआप