शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अमरिंदर सिंग नवे 'कॅप्टन', सिद्धूचं स्वप्न भंगलं

By admin | Updated: March 16, 2017 11:57 IST

पंजाबचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शपथ घेतली असून दुस-यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली आ

ऑनलाइन लोकमत
हरियाणा, दि. 16 - पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शपथ घेतली असून दुस-यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र अमरिंदरसिंग यांनी यासाठी नकार दिल्याने सिद्धूचं स्वप्न भंगलं. सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणुक जिंकले आहेत. 
 
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जबरदस्त विजयासह दहा वर्षांनी मुख्यमंत्री म्हणून पंजाबमध्ये पुनरागमन करणार अमरिंदरसिंग यांनी राज्यात कोणीही दुस-या क्रमांकाचा नेता नको आहे. यासंबंधी त्यांनी पक्ष हायकमांडलाही कळवलं होतं. 
 
विशेष गोष्ट म्हणजे अमरिंदरसिंग यांनी शपथ घेत एक नवा इतिहास रचला आहे. 1966 पासून पंजाबमध्ये काँग्रेसचे आतापर्यंत एकूण पाच मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र यामधील कोणीही दुस-यांदा मुख्यमंत्री होऊ शकलं नाही. अमरिंदसिंग दहा वर्षांनी पंजाबची दुस-यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. 
 
दरम्यान काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची रविवारी चंदीगडच्या सेक्टर-१५ येथील पंजाब काँग्रेस मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत कॅप्टन अमरिंदरसिंग यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीला काँग्रेसच्या पंजाब प्रभारी आशा कुमारी उपस्थित होत्या. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मुख्यमंत्री बनतील, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे या बैठकीत केवळ औपचारिकता म्हणून कॅप्टन अमरिंदरसिंग यांची नेतेपदी निवड करण्यात आली.
 
कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या बळावर काँग्रेसने विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७७ जागा जिंकल्या आहेत.
 
तत्पूर्वी मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा सादर दिला. राज्यपालांनी बादल यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावर कायम राहण्याचा सल्ला दिला.
 
अकाली दल-भाजपाच्या पराभवाबद्दल बोलताना प्रकाशसिंग बादल म्हणाले, ‘युतीच्या पराभवाची समीक्षा केली जाईल. हा जनादेश आम्ही मान्य करतो.’ या निवडणुकीत अकाली दलाला केवळ १५ तर भाजपाला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यपालांनी बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर विधानसभा विसर्जित केली. आता नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी नव्या विधानसभेचे अधिवेशन १८ मार्च रोजी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.