शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

यावल, रावेरमध्ये जलपातळीत मोठी घट अमळनेरचा जलसाठा तीन मिटर घटला : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव : अत्यल्प पाऊस, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड या सार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.

जळगाव : अत्यल्प पाऊस, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड या सार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.
भूजल सर्वेक्षण विभाग कार्यालयामार्फत तालुकानिहाय विहिरींचे निरीक्षण करण्यात येत असते. सप्टंेबर महिन्यातील अहवालानंतर या कार्यालयाने जानेवारी महिन्याच्या अखेर प्रत्येक तालुक्यातील विहिरीचे निरीक्षण करून भूगर्भातील जलपातळीची मोजणी केली आहे.
अमळनेर, चाळीसगाव व धरणगावात धोक्याची घंटा
भूजल सर्वेक्षण विभागातर्फे अमळनेर तालुक्यातील १४, चाळीसगाव तालुक्यातील २१ व धरणगाव तालुक्यातील सात तर पारोळा तालुक्यातील १६ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या चारही तालुक्यांमध्ये अडीच ते तीन मीटरपर्यंत जलपातळीतील घट नोंदविण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मोजणीत बोदवड तालुक्यात सर्वाधिक अडीच मीटरने जलपातळीत घट झाल्याची नोंद होती. त्यापाठोपाठ अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात दीड मीटरने जलपातळीत घट झाली होती.

चोपडा, यावल व रावेरला मोठा फटका
४ सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे यावल, रावेर, चोपडा व भुसावळ तालुक्यांना दिलासा मिळाल्याने या तालुक्यातील जलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. पावणे तीन मिटरने यावल तालुक्यातील वाढ नोंदविण्यात होती. मात्र प्रचंड उपसा केल्यामुळे यावल तालुक्यात २.७७ मीटरने जलपातळीत घट झाली आहे. चोपडा तालुक्यात २.५१ मीटरने तर रावेर तालुक्यात १.१६ मीटरने भूगर्भातील जलपातळीत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने जलपातळीत घट होत आहे.
मुक्ताईनगर व भुसावळात अत्यल्प घट
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भूजलपातळीत घट होत असताना मुक्ताईनगर, भुसावळ व एरंडोल तालुक्यात काहीशी स्थिती चांगली आहे. भुसावळ तालुक्यात ०.८८, मुक्ताईनगर तालुक्यात ०.९६ तर एरंडोल तालुक्यात १.०७ मीटरने भूजलपातळीतील घट नोंदविली आहे.
४भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनुपमा पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हाभरातील १७८ विहिरींचे सर्वेक्षण केले. भूजलपातळीची मोजणी करताना जानेवारी २०११ व जानेवारी २०१६ या महिन्यातील भूजलपातळीचा तुलनात्मक अभ्यास करून तालुकानिहाय वाढीचा किंवा घट झाल्याचा अहवाल तयार केला आहे. पाच वर्षात सरासरी पाणी पातळीचीदेखील नोंद केली आहे.