शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

देश होरपळला तरी मोदींना चिंता पंतप्रधानपदाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:50 IST

राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे

शीलेश शर्मा, नितीन अग्रवाल।नवी दिल्ली : भले देश होरपळू दे, मुलींवर बलात्कार होऊदेत, दलित व अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत असेल पण नरेंद्र मोदी यांचे सारे लक्ष पुन्हा पंतप्रधान बनण्याकडेच लागलेले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ‘राज्यघटना (संविधान) बचाव' या मोहिमेचा प्रारंभ करताना ते म्हणाले की, राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे. मात्र या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाची गळचेपी करत असून संसदेतील कामकाजही बंद पाडले आहे.देशातील विविध यंत्रणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा भरणा केला जात आहे असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, दलितांनी केलेल्या स्वच्छताकार्यामध्ये पंतप्रधानांना आध्यात्मिकतेचे दर्शन झाले. मात्र दलित, तसेच समाजातील दुर्बल घटक, महिला यांच्याविषयी पंतप्रधानांच्या मनात अजिबात कणव नसल्याचे देशाने पाहिले आहे.

ही कुटुंब वाचवण्याची मोहीम : अमित शहा‘संविधान बचाओ' मोहीम देशाला नव्हे तर स्वत:च्या कुटुंबाला वाचविण्यासाठी आहे अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. घटनेची मूल्ये काँग्रेसनेच पायदळी तुडवली आहेत. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात काँग्रेसनेच पुढाकार घेतला. देशातील प्रत्येक यंत्रणेला दुर्बल करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. राज्यघटनेच्या रक्षणाची भाषा करणाºया गांधी घराण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केला होता. तीच परंपरा आता राहुल गांधी चालवत आहेत असेही अमित शहा म्हणाले.भाजपपासून बेटी ‘बचाओ'राहुल गांधी म्हणाले की, रोजगाराच्या संधी तसेच अन्य गोष्टींबाबत गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी जनतेला भरभरून आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाहीत. आता येत्या लोकसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोदी नवीन आश्वासनांचा मारा करतील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशी घोषणा मोदींनी दिली होती. पण भाजपा व त्याच्या नेत्यांपासूनच ‘बेटी बचाओ' म्हणण्याची वेळआहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी