शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

देश होरपळला तरी मोदींना चिंता पंतप्रधानपदाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:50 IST

राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे

शीलेश शर्मा, नितीन अग्रवाल।नवी दिल्ली : भले देश होरपळू दे, मुलींवर बलात्कार होऊदेत, दलित व अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत असेल पण नरेंद्र मोदी यांचे सारे लक्ष पुन्हा पंतप्रधान बनण्याकडेच लागलेले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ‘राज्यघटना (संविधान) बचाव' या मोहिमेचा प्रारंभ करताना ते म्हणाले की, राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे. मात्र या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाची गळचेपी करत असून संसदेतील कामकाजही बंद पाडले आहे.देशातील विविध यंत्रणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा भरणा केला जात आहे असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, दलितांनी केलेल्या स्वच्छताकार्यामध्ये पंतप्रधानांना आध्यात्मिकतेचे दर्शन झाले. मात्र दलित, तसेच समाजातील दुर्बल घटक, महिला यांच्याविषयी पंतप्रधानांच्या मनात अजिबात कणव नसल्याचे देशाने पाहिले आहे.

ही कुटुंब वाचवण्याची मोहीम : अमित शहा‘संविधान बचाओ' मोहीम देशाला नव्हे तर स्वत:च्या कुटुंबाला वाचविण्यासाठी आहे अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. घटनेची मूल्ये काँग्रेसनेच पायदळी तुडवली आहेत. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात काँग्रेसनेच पुढाकार घेतला. देशातील प्रत्येक यंत्रणेला दुर्बल करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. राज्यघटनेच्या रक्षणाची भाषा करणाºया गांधी घराण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केला होता. तीच परंपरा आता राहुल गांधी चालवत आहेत असेही अमित शहा म्हणाले.भाजपपासून बेटी ‘बचाओ'राहुल गांधी म्हणाले की, रोजगाराच्या संधी तसेच अन्य गोष्टींबाबत गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी जनतेला भरभरून आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाहीत. आता येत्या लोकसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोदी नवीन आश्वासनांचा मारा करतील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशी घोषणा मोदींनी दिली होती. पण भाजपा व त्याच्या नेत्यांपासूनच ‘बेटी बचाओ' म्हणण्याची वेळआहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी