शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

साध्या सरळ स्वभावाच्या रामनाथ कोविंदांची अशीही आठवण

By admin | Updated: June 19, 2017 19:02 IST

अत्युच्च पदावर राहूनही तळागाळातल्या लोकांची दखल घेणारा, सुह्रद आणि यशाच्या शिखरावरही मातीशी नाळ न तोडणारी व्यक्ती ही आहे कोविंदांची ओळख...

ऑनलाइन लोकमत, मुंबई
रालोआने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आणि मुंबई ठाणे परीसरातील कोळी बांधवांना आनंद झाला. केवळ कोळी समाजातील व्यक्ती राष्ट्रपती होणार म्हणून नाही, तर अत्युच्च पदावर राहूनही तळागाळातल्या लोकांची दखल घेणारा, सुह्रद आणि यशाच्या शिखरावरही मातीशी नाळ न तोडणारी व्यक्ती राष्ट्रपती होणार या भावनेतून.
ठाण्याच्या राकेश शांतीलाल पटेलांनी अशीच एक आठवण शेअर केली आहे. ठाण्यातील परेश कोळी यांच्याबरोबर नवी दिल्लीत झालेल्या कोविंद यांच्या भेटिशी या आठवणीचा संदर्भ आहे. आधी दोन-तीनवेळा कोविंद यांच्याशी पटेल व कोळी यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या, परंतु ही 1994 च्या सुमारासची दिल्लीतली भेट विशेष ठरली. त्यावेळी रामनाथ कोविंद राज्यसभेत खासदार होते. आधी ठरल्याप्रमाणे, पटेल आणि कोळी दिल्लीत पोचले. दिल्लीला उतरल्यावर त्यांना वाटले की कोविंदसाहेबांनी कुणालातरी गाडी घेऊन पाठवले असेल. परंतु, बघतात तो साक्षात राज्यसभेचा खासदार त्यांना न्यायला गाडी घेऊन रेल्वे स्टेशनावर आला होता, तेदेखील मारूति 800 ही कार स्वत: चालवत. त्यांना गाडीत बसल्यावर कळलं की आज रविवार असल्यामुळे ड्रायव्हरची रजा आहे, आणि सुट्टीवर असलेल्या ड्रायव्हरला कशाला त्रास द्या किंवा स्नेहींना त्यांची सोय करायला कशाला सांगा असा विचार करत स्वत: खासदारसाहेब ड्रायव्हर झाले आणि पटेल व कोळींना त्यांनी साऊथ अॅव्हेन्यूला सोडलं. त्यांची नीट सोय लावून झाल्यावर कोविंदसाहेब निघून गेले. त्यांचा तो साधेपणा व अत्यंत सरळ वागणबोलणं यामुळेच ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोचले असल्याची भावना पटेल यांनी व्यक्त केली आहे.
कोळी समाजासाठी कटिबद्ध
कोळी समाजाचं कुठलंही काम असलं तरी कोविंद साहेब प्रोटोकॉल वगैरे बाजुला ठेवून समाजासाठी धाव घेतात असा कोळी समाजाचा अनुभव आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई-ठाण्यामध्ये कोळी समाज मोठ्या संख्येने असून ठाण्यामध्ये रामनाथ कोविंद अनेकवेळा आले आहेत.
एकदा तर कोविंद बिहारचे राज्यपाल झाल्यानंतरचा किस्सा स्थानिक नेते आवर्जून सांगतात. ठाण्यामधल्या एका कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. निमंत्रण मिळाल्यानंतर कुठल्याही प्रोटोकॉल वगैरेची फिकीर न करता कोविंद थेट ठाण्यात दाखल झाले. स्थानिक कार्यकर्त्यांनाही ते ठाण्यात थेट आल्यावरच समजले की कोविंदसाहेब आलेत म्हणून. त्यांनी साहेब आम्हाला आधी कल्पना तरी द्यायची म्हणजे नीट यायची सोय केली असती असे सांगितले. त्यावर अरे घरच्याच कार्यक्रमाला कशाला अशा गोष्टी करायच्या असा अविर्भाव कोविदांचा होता, अशी आठवण एका स्थानिक नेत्याने व्यक्त केली.
त्यामुळे, राज्यपालासारख्या पदावर राहूनही अत्यंत जमिनीवर पाय असलेल्या आणि जुन्या संबंधांना न विसरणाऱ्या कोविंदाची राष्ट्रपतीपदी निवड झालेली बघून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
 
 
आणखी वाचा
राष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी