शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप

By admin | Updated: April 5, 2016 08:29 IST

भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप या अधिका-याने केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले असताना तसंच पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असतानादेखील पाकिस्तान या हल्ल्याचा कट त्यांच्याच देशात दहशतवाद्यांनी रचला असल्याचं मान्य करायला तयार नाही आहे. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तान तपास पथकाला पुरेसे वाटत नसल्याची माहिती आली होती. आणि आता तर पाकिस्तानने हा हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचला असल्याचा दावा केला आहे. 
 
पाकिस्तान टुडेने तपास पथकातील अधिका-याने ही माहिती दिल्याचं वृत्त दिलं आहे. 'भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा', आरोप या अधिका-याने केला आहे. पाकिस्तानचं तपास पथक आपला हा अहवाल पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे येत्या काही दिवसांत सोपवणार आहे. 
 
या अहवालात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी तन्जील अहमद यांच्या हत्येचीदेखील माहिती देण्यात आली आहे. 'तपास करणा-या मुस्लिम अधिका-याची हत्या हा या गोष्टीचा पुरावा आहे की भारताला हा मुद्दा दाबायचा आहे', असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. एनआयएने पाकिस्तान तपास पथकाला भारत दौ-यादरम्यान अजिबात सहकार्य केलं नसल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 
एनआयएने दिलेल्या माहितीच्या अत्यंत उलट माहिती पाकिस्तानी तपास पथक देत आहे. पाकिस्तानी अधिका-यांवर दबाब असल्या कारणाने ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असल्याचा दावा भारतीय सरकारमधील सुत्रांकडून मिळाली आहे. पाकिस्तान नागरिकांनीच हा हल्ला रचल्याचं अधिका-यांनी सांगितलं तर कदाचित काही लोक नाराज होतील त्यामुळे हा खटाटोप सुरु असल्यांचं सुत्रांनी सांगितलं आहे. 
 
तपास पथकाने पाकिस्तान टुडेला दिलेल्या माहितीप्रमाणे दहशतवादी पाकिस्तानमधून भारतात घुसले हे सिद्ध करण्यास भारतीय अधिकारी अयशस्वी ठरलेत. पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी जगाचं लक्ष वेधून घ्याव यासाठी भारताने हा ड्रामा केल्याचा आरोप करत पाकिस्तानने कोलांटीउडी घेतली आहे.