शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप

By admin | Updated: April 5, 2016 08:29 IST

भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप या अधिका-याने केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले असताना तसंच पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असतानादेखील पाकिस्तान या हल्ल्याचा कट त्यांच्याच देशात दहशतवाद्यांनी रचला असल्याचं मान्य करायला तयार नाही आहे. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तान तपास पथकाला पुरेसे वाटत नसल्याची माहिती आली होती. आणि आता तर पाकिस्तानने हा हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचला असल्याचा दावा केला आहे. 
 
पाकिस्तान टुडेने तपास पथकातील अधिका-याने ही माहिती दिल्याचं वृत्त दिलं आहे. 'भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा', आरोप या अधिका-याने केला आहे. पाकिस्तानचं तपास पथक आपला हा अहवाल पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे येत्या काही दिवसांत सोपवणार आहे. 
 
या अहवालात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी तन्जील अहमद यांच्या हत्येचीदेखील माहिती देण्यात आली आहे. 'तपास करणा-या मुस्लिम अधिका-याची हत्या हा या गोष्टीचा पुरावा आहे की भारताला हा मुद्दा दाबायचा आहे', असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. एनआयएने पाकिस्तान तपास पथकाला भारत दौ-यादरम्यान अजिबात सहकार्य केलं नसल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 
एनआयएने दिलेल्या माहितीच्या अत्यंत उलट माहिती पाकिस्तानी तपास पथक देत आहे. पाकिस्तानी अधिका-यांवर दबाब असल्या कारणाने ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असल्याचा दावा भारतीय सरकारमधील सुत्रांकडून मिळाली आहे. पाकिस्तान नागरिकांनीच हा हल्ला रचल्याचं अधिका-यांनी सांगितलं तर कदाचित काही लोक नाराज होतील त्यामुळे हा खटाटोप सुरु असल्यांचं सुत्रांनी सांगितलं आहे. 
 
तपास पथकाने पाकिस्तान टुडेला दिलेल्या माहितीप्रमाणे दहशतवादी पाकिस्तानमधून भारतात घुसले हे सिद्ध करण्यास भारतीय अधिकारी अयशस्वी ठरलेत. पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी जगाचं लक्ष वेधून घ्याव यासाठी भारताने हा ड्रामा केल्याचा आरोप करत पाकिस्तानने कोलांटीउडी घेतली आहे.