शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप

By admin | Updated: April 5, 2016 08:29 IST

भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप या अधिका-याने केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले असताना तसंच पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असतानादेखील पाकिस्तान या हल्ल्याचा कट त्यांच्याच देशात दहशतवाद्यांनी रचला असल्याचं मान्य करायला तयार नाही आहे. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तान तपास पथकाला पुरेसे वाटत नसल्याची माहिती आली होती. आणि आता तर पाकिस्तानने हा हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचला असल्याचा दावा केला आहे. 
 
पाकिस्तान टुडेने तपास पथकातील अधिका-याने ही माहिती दिल्याचं वृत्त दिलं आहे. 'भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा', आरोप या अधिका-याने केला आहे. पाकिस्तानचं तपास पथक आपला हा अहवाल पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे येत्या काही दिवसांत सोपवणार आहे. 
 
या अहवालात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी तन्जील अहमद यांच्या हत्येचीदेखील माहिती देण्यात आली आहे. 'तपास करणा-या मुस्लिम अधिका-याची हत्या हा या गोष्टीचा पुरावा आहे की भारताला हा मुद्दा दाबायचा आहे', असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. एनआयएने पाकिस्तान तपास पथकाला भारत दौ-यादरम्यान अजिबात सहकार्य केलं नसल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 
एनआयएने दिलेल्या माहितीच्या अत्यंत उलट माहिती पाकिस्तानी तपास पथक देत आहे. पाकिस्तानी अधिका-यांवर दबाब असल्या कारणाने ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असल्याचा दावा भारतीय सरकारमधील सुत्रांकडून मिळाली आहे. पाकिस्तान नागरिकांनीच हा हल्ला रचल्याचं अधिका-यांनी सांगितलं तर कदाचित काही लोक नाराज होतील त्यामुळे हा खटाटोप सुरु असल्यांचं सुत्रांनी सांगितलं आहे. 
 
तपास पथकाने पाकिस्तान टुडेला दिलेल्या माहितीप्रमाणे दहशतवादी पाकिस्तानमधून भारतात घुसले हे सिद्ध करण्यास भारतीय अधिकारी अयशस्वी ठरलेत. पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी जगाचं लक्ष वेधून घ्याव यासाठी भारताने हा ड्रामा केल्याचा आरोप करत पाकिस्तानने कोलांटीउडी घेतली आहे.