शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

डोकोमो प्रकरणी होत असलेले आरोप निराधार - सायरस मिस्त्री

By admin | Updated: November 1, 2016 18:19 IST

जपानी कंपनी डोकोमोसोबत झालेल्या विवाद योग्य पद्धतीने न हाताळल्याचे आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचे सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 1 -  सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील आरोप प्रत्यारोपांचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. जपानी कंपनी डोकोमोसोबत झालेल्या विवाद योग्य पद्धतीने न हाताळल्याचे आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचे टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे. 
सायरस मिस्त्रींवर डोकोमो प्रकरणात मिस्त्रींवर करण्यात आलेल्या आरोपांना करण्यात आलेल्या मिस्त्री यांच्या कार्यालयाकडून मंगळवारी सविस्तर प्रत्त्युत्तर देण्यात आले.  डोकोमो व्यवहाराबाबतचे सर्व निर्णय हे टाटा आणि सन्सच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर  सामुहिकपणे घेण्यात आले होते, असे मिस्त्री यांनी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.  
मिस्त्री  म्हणाले, "डोकोमो प्रकरण हाताळताना टाटाची संस्कृती आणि मूल्यांच्या आधारावर निर्णय न घेतल्याचा माझ्यावर होत असलेला आरोप खोटा आणि निराधार आहेत. " डोकोमो खटला ज्यापद्धतीने लढवण्यात आला. त्याला टाटा आणि ट्रस्टची संमती मिळाली नसती असे मानणे चुकीचे ठरेल, असेही मिस्त्री यांनी सांगितले.  
  टाटाची सहयोगी कंपनी आणि जपानी कंपनी एनटीटी डोकोमो यांच्यात 2009 साली करार झाला होता. या करारानुसार डोकोमोने टाटामधील शेअर खरेदी केले होते. जपानी कंपनी तीन वर्षांनंतर आपले समभाग टाटाला किंवा शेअर बाजारात विकू शकतात, अशी तरतूद या करारात होती.  मात्र त्यानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये विवाद झाला. तसेच डोकोमोने टाटाविरोधात आंतरराष्ट्रीय लवादासमोर दावा दाखल केला. ज्याचा निकाल डोकोमोच्या बाजूने लागला.