शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणाहून येणारे पाणी विषारी असल्याचा दिल्ली सरकारचा आरोप

By admin | Updated: February 28, 2016 15:55 IST

हरियाणामधून दिल्लीला पाणी पुरवठा होणा-या काही परिसरांत पाण्यामध्ये विष मिसळले असल्याचा आरोप दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल शर्मा यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २८ - हरियाणामधून दिल्लीला पाणी पुरवठा होणा-या काही परिसरांत पाण्यामध्ये विष मिसळले असल्याचा आरोप दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल शर्मा यांनी केला आहे. पाणी विषारी असल्या कारणाने पाण्यातील अमोनिया स्तर वाढला आहे. ज्यामुळे २ महत्वाचे वॉटर प्लांट बंद करण्यात आले आहेत. 
 
गेले २ महिने अमोनिया स्तर वाढला असल्याने आम्हाला अनेक वेळा वॉटर प्लांट बंद ठेवावे लागले आहेत. वझिराबाद, चंद्रावल आणि ओखलामधील प्लांट बंद करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा करणा-या मुख्य मुनक कालव्याची जाट आंदोलनादरम्यान तोडफोड करण्यात आली आहे. दिल्लीला याअगोदर कधीच अशाप्रकारे पाणी समस्येला सामोरे जावं लागलं नसल्याचं कपील शर्मा यांनी सांगितलं आहे.
 
दिल्ली सरकारने अमोनिया स्तर कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र स्तर वाढतच चालला आहे. ज्यामुळे वझिराबाद आणि चंद्रावलमधील प्लांट बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती कपील शर्मा यांनी दिली आहे. अमोनिया सापडल्याचे आमच्याकडे पुरावे असल्याचंही कपील शर्मा यांनी सांगितलं आहे. यामुळे दिल्लीतील ३५ ते ४० लाख लोकांना पाणीपुरवठा होत नाही आहे. तसंच जोपर्यंत वझिराबाद आणि चंद्रावल वॉटर प्लांट सुरु होत नाहीत मध्य आणि उत्तर दिल्लीलादेखील पाणीपुरवठा करणं शक्य नसल्याची माहिती कपिल शर्मा यांनी दिली आहे.