ऊसतोडणी कामगारांचा संपाचा इशारा पिळवणुकीचा आरोप : पाठपुराव्यानंतरही मागण्या प्रलंबितच
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
अहमदनगर : गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करुनही शासन दरबारी मागण्या मार्गी लागत नसल्याने राज्य ऊस तोडणी वाहतूक, मुकादम कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे़ राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांना त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे़
ऊसतोडणी कामगारांचा संपाचा इशारा पिळवणुकीचा आरोप : पाठपुराव्यानंतरही मागण्या प्रलंबितच
अहमदनगर : गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करुनही शासन दरबारी मागण्या मार्गी लागत नसल्याने राज्य ऊस तोडणी वाहतूक, मुकादम कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे़ राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांना त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे़ साखरसंघ व ऊस तोडणी कामगार संघटनेत झालेल्या सामंजस्य कराराची मुदत पाच वर्षांपूर्वीच संपली़ कामगारांना मात्र, मागील कराराप्रमाणेच मजुरी व इतर तरतुदी लागू आहेत़ नव्या कराराअभावी पिळवणूक होत असल्याची भावना कामगारांमध्ये आहे.ऊसतोडणी कामगारांच्या प्रचलित दरात दुप्पट वाढ करावी, मुकादमांचे कमिशन वाढवावे, कामगारांना २०१४-१५ चे फरकबिल नवीन दरवाढीप्रमाणे मिळावे, सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करावी, कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळा सुरू कराव्यात, कुटुंब व पाल्यांच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेच्या निधीतून मदत करावी, ऊस तोडणी कामगार उन्नती प्रकल्प राज्यात राबविण्यात यावा आदी संघटनेच्या मागण्या आहेत. साखर संघ अध्यक्षांसह, मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)