शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

भाजपने तिकिटे विकल्याचा आरोप

By admin | Updated: September 26, 2015 22:06 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय जनता पार्टीचे खासदार राजकुमार सिंह यांनी शनिवारी पक्षाकडून गुन्हेगारांना तिकिटे विकण्यात येत असल्याचा आरोप करून पक्षाला घरचा अहेर दिला

पाटणा/नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय जनता पार्टीचे खासदार राजकुमार सिंह यांनी शनिवारी पक्षाकडून गुन्हेगारांना तिकिटे विकण्यात येत असल्याचा आरोप करून पक्षाला घरचा अहेर दिला. दुसरीकडे भाजपाने हा आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळला आहे. परंतु विरोधी पक्षांनी मात्र सिंह यांचा आरोप अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.माजी केंद्रीय गृहसचिव आणि आरा येथून प्रथमच लोकसभेवर निवडून गेलेले सिंह यांनी शनिवारी पाटण्यात सच्च्या कार्यकर्त्यांना डावलून गुन्हेगारांना तिकीट देण्यात येत असल्याचा आरोप करून पक्षाची चांगलीच फजिती केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर अशापरिस्थितीत जंगलराज म्हणून कायम लक्ष्य करण्यात येणारे राजदचे लालूप्रसाद यादव आणि भाजप यांच्यात काय फरक राहिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गुन्हेगारांना पक्षात सामील करून घेण्यापूर्वीच तिकिटे देण्यात आली. हा बिहारच्या जनतेवर अन्याय असून यामुळे आपल्यासोबतही विश्वासघात झाला आहे. काही लोकांनी तिकिटे विकली. हे काय सुरू आहे? आम्ही स्वच्छ प्रशासन कसे देणार? पक्षाची नाचक्की करणाऱ्या या वक्तव्यानंतरही सिंह यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कारवाईची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सिंग यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले की, पक्षातर्फे सर्व पैलू विचारात घेऊन निष्पक्ष पद्धतीने तिकीट वाटप झाले आहे. बिहारचा जेथवर प्रश्न आहे तर राज्यात भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. आम्हाला बिहारच्या जनतेचा पाठिंबा आहे. ---------बिहार निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी गुन्हेगारांना तिकीट वाटपाचा सिंह यांचा दावा सपशेल फेटाळून लावला. भाजपत वरिष्ठ नेत्यांसोबत विचारविनिमय केल्यानंतरच उमेदवार निश्चित केले जातात, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.पक्षातर्फे उमेदवारांची निवड करताना पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीचा अवलंब केला जातो, असा दावा भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी केला असून, पक्षशिस्त पाळण्याचे आवाहन त्यांनी सिंह यांना केले आहे.आर.के. सिंह यांना लोजपाचा पाठिंबारालोआचा मुख्य घटक असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने भाजपा खासदार आर.के. सिंह यांच्या बिहारमध्ये कलंकित उमेदवारांना भाजपाचे तिकीट मिळत असल्याच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आहे. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही लोजपने स्पष्ट केले. सिंह यांच्या आरोपाने राज्यात रालोआच्या भवितव्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे लोजपा नेते चिराग पासवान यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)