शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

सर्व व्यवहार होतील बोटांच्या ठशांनी!

By admin | Updated: January 9, 2017 04:08 IST

नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम

बंगळुरु : नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस यंत्रे कालबाह्य ठरून केवळ बोटांच्या ठशांनी पैशांचे सर्व व्यवहार करणे शक्य होईल, असा विश्वास निती आयोगाने व्यक्त केला आहे.येथे सुरु असलेल्या तीन दिवसांच्या प्रवासी भारतीय परिषदेत युवकांसाठी आयोजित केलेल्या ‘स्टार्टअअप्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन्स’ यावरील चर्चासत्रात बोलताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा विश्वास व्यक्त केला.कांत म्हणाले की, वित्तीय तंत्रज्ञान आणि सामाजिक नवविचार या दोन्ही बाबतीत सध्या मोठ्या सृजनात्मक विध्वसांचे वातावरण आहे. यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारताला खूप मोठी झेप घेणे शक्य होईल.देशातील १०० कोटी नागरिकांची बोटांचे ठसे व डोळ््याच्या बाहुल्यांच्या नकला अशी बायोमेट्रिक माहितीचा खजिना असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. याचा वापर करून अलिकडेच सरकारने ‘भीम अ‍ॅप’ व ‘आधार’वर आधारित व्यवहार करण्याची यंत्रणा सुरु केली आहे. याचा संदर्भ देत कांत म्हणाले की, सन २०२० पर्यंत भारतीयांना कोणताही पैशाचा व्यवहार केवळ अंगठ्याचा (ठसा) वापरून अवघ्या ३० सेकंदात पार पाडणे शक्य होईल, तसे झाले म्हणजे ओघानेच क्रेटिड व डेबिट कार्ड, एटीएम व पीओएस यंत्रांची गरजच राहणार नाही. (वृत्तसंस्था)अर्थव्यवस्था तिप्पट वाढेलकांत म्हणाले की, सध्या भारताची अर्थव्यवस्था तीन खर्व डॉलरची आहे. य्पैकी दोन खर्व डॉलरची औपचारिक अर्थव्यवस्था आहे तर आणखी एक खर्व डॉलरची अर्थव्यवस्था अनौपचारिक आहे. सध्या देशातील फक्त २ ते २.५ टक्के लोक कर भरतात. औपचारिक अर्थव्यवस्था वाढून जास्तीत जास्त लोक कर यंत्रणेच्या कक्षेत आल्याखेरीज १० खर्व डॉलरचे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. त्यासाठी डिजिटल व्यवहारांखेरीज तरणोपाय नाही.