शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:51 IST

ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणारे तिन्ही दहशतवादी मारले गेल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

Amit Shah on Operation Mahadev : लोकसभेत दुसऱ्या दिवशीही ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा सुरू आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणारे तिन्ही दहशतवादी मारले गेल्याची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान उर्फ फैजल अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेल्याचे सांगितले. सुलेमान हा लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेड कमांडर होता. अफगाण हा लष्कर-ए-तैयबाचा ए-ग्रेड दहशतवादी होता आणि जिब्रान देखील ए-ग्रेड दहशतवादी होता. या तीन दहशतवादीनी बैसरन खोऱ्यात आपल्या नागरिकांची हत्या केली होती असंही अमित शाह म्हणाले.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तिन्ही दशहतवाद्यांना कसं मारलं आणि त्याची तयारी कधीपासून सुरु होती याची सविस्तर माहिती दिली. मे महिन्यापासून दहशतावाद्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले. यासोबत दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी रायफलींची चाचणी केल्याचेही त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांच्या रायफली रात्री विमानाने चंदीगडला पाठवण्यात आलं.

"ज्यांनी बैसरन व्हॅलीमध्ये आपल्या नागरिकांना मारलं होतं तेच हे तीन दहशतवादी होते आणि तिघेही मारले गेलेले आहेत. या कारवाईत पॅरा ४चे, सीआरपीएफचे ९२ जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान सामील होते. त्या सर्वांचे देशाच्या वतीने आभार मानतो. ऑपरेशन महादेवची सुरुवात २२ मे रोजी झाली. ज्या दिवशी पर्यटकांची हत्या झाली त्याच दिवशी रात्री एक सुरक्षा बैठक घेण्यात आली होती. एक वाजता हल्ला झाल्यानंतर मी साडेपाच वाजता जम्मू काश्मीरमध्ये होतो. २३ एप्रिल रोजी सर्व सुरक्षा दलांची एक बैठक घेण्यात आली. त्यात दशतवाद्यांना पाकिस्तानात पळू जाता येणार नाही याची आम्ही काळजी घेतली. २२ मे रोजी आयबीकडे एक गुप्त माहिती आली. दाचीगाम येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. आयबी आणि सैन्याद्वारे दाचिगाममध्ये अल्ट्रा सिग्नल कॅप्चर करण्यासाठी मे पासून २२ जुलै पर्यंत सातत्याने प्रयत्न केले गेले. थंडीत उंचीवर आपले अधिकारी हे सिग्नल मिळवण्यासाठी फिरत होते.२२ जुलै रोजी सेन्सरद्वारे तिथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पॅरा ४ चे जवान, सीआरपीएफच्या जवानांनी या दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर सोमवारी झालेल्या कारवाईत आपल्या निर्दोष नागरिकांना मारणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं," असं अमित शाह म्हणाले.

"सुलेमान उर्फ फैजल, अफगाण आणि जिब्रा अशी तिघांची नावे आहेत. एनआयएने त्यांना जेवण पुरवणाऱ्या लोकांना स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं. जेव्हा दहशवाद्यांचे मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आले तेव्हा त्यांची ओळख पटवण्यात आली. चार लोकांनी हे तेच दहशतवादी असल्याचे ओळखले. पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्ही पहलगाममध्ये जी काडतुसे मिळाली होती त्याचा एफएसएल अहवाल आधीच तयार करुन ठेवला होता. चंदीगड एफएसएल सेंटरमध्ये बॅलेस्टिक रिपोर्टच्या आधारे अहवाल तयार होता. सोमवारी मारले गेलेल्या दहशतावाद्यांच्या रायफली जप्त करण्यात आल्या. त्यात एक एम ९ अमेरिकन रायफल आणि दोन एके ४७ रायफल होत्या. पहगलगाममध्ये मिळालेली काडतुसे एम ९  आणि एके ४७ चे होते. त्या रायफली रात्री १२ वाजता विमानाने चंदीगडला पाठवण्यात आल्या. रात्रभर फायरिंग करुन त्यांची काडतुसे मिळवली. दोन्ही काडतुसे तपासून पाहिली. तेव्हाच स्पष्ट झालं की या तिन्ही रायफलींनी आपल्या निष्पाप नागरिकांची हत्या झाली होती," असंही अमित शाह यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरAmit Shahअमित शाहPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला