शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

...त्या सगळ्या अफवाच - स्वराज

By admin | Updated: June 17, 2017 20:25 IST

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपले नाव असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.17- राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपले नाव असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाकपाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. या भेटीमध्ये कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे देखिल उपस्थित होते. भाजपाने कोणतेही नाव चर्चेत जाहीर केले नसल्यामुळे सहमतीचा प्रश्नच येत नाही असे आझाद यांनी बैठकीबाबत बोलताना सांगितले.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 14 जुलै रोजी संपत असून नव्या राष्ट्रपतींसाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 28 जून असून 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्यास अवधी असेल. सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांनी आतापर्यंत कोणाचेही नाव उमेदवारीसाठी जाहीर केलेले नाही. यामुळे भावी राष्ट्रपतींबाबत विविध नावांची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेक नावांची याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले दोन दिवस मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांचेही नाव पुढे येत होते मात्र श्रीधरन यांनीही स्वतःच अशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी यापुर्वीच रा .स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते, तर त्यानंतर डॉ.स्वामीनाथन यांना आपली पसंती असल्याचे स्पष्ट केले. मात्र अद्याप सरकारतर्फे कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

भाजपातर्फे उभ्या केल्या जाणाऱ्या उमेदवाराला आपला पाठिंबा असेल तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने जाहीर केले आहे. "एम.जी. रामचंद्रन आणि पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचे केंद्राशी नेहमीच सौहार्दपुर्ण संबंध राहिले आहेत. जयललिता नेहमीच कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे." असे अण्णाद्रमुकचे नेते आणि लोकसभेचे उपसभापती तंबी दुराई यांनी पाठिंब्याबाबत बोलताना सांगितले. अण्णाद्रमुकसह वायएसआर कॉंग्रेसनेही रालोआच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.