शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

...त्या सगळ्या अफवाच - स्वराज

By admin | Updated: June 17, 2017 20:25 IST

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपले नाव असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.17- राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपले नाव असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाकपाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. या भेटीमध्ये कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे देखिल उपस्थित होते. भाजपाने कोणतेही नाव चर्चेत जाहीर केले नसल्यामुळे सहमतीचा प्रश्नच येत नाही असे आझाद यांनी बैठकीबाबत बोलताना सांगितले.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 14 जुलै रोजी संपत असून नव्या राष्ट्रपतींसाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 28 जून असून 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्यास अवधी असेल. सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांनी आतापर्यंत कोणाचेही नाव उमेदवारीसाठी जाहीर केलेले नाही. यामुळे भावी राष्ट्रपतींबाबत विविध नावांची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेक नावांची याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले दोन दिवस मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांचेही नाव पुढे येत होते मात्र श्रीधरन यांनीही स्वतःच अशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी यापुर्वीच रा .स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते, तर त्यानंतर डॉ.स्वामीनाथन यांना आपली पसंती असल्याचे स्पष्ट केले. मात्र अद्याप सरकारतर्फे कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

भाजपातर्फे उभ्या केल्या जाणाऱ्या उमेदवाराला आपला पाठिंबा असेल तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने जाहीर केले आहे. "एम.जी. रामचंद्रन आणि पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचे केंद्राशी नेहमीच सौहार्दपुर्ण संबंध राहिले आहेत. जयललिता नेहमीच कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे." असे अण्णाद्रमुकचे नेते आणि लोकसभेचे उपसभापती तंबी दुराई यांनी पाठिंब्याबाबत बोलताना सांगितले. अण्णाद्रमुकसह वायएसआर कॉंग्रेसनेही रालोआच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.