शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

...त्या सगळ्या अफवाच - स्वराज

By admin | Updated: June 17, 2017 20:25 IST

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपले नाव असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.17- राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपले नाव असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाकपाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. या भेटीमध्ये कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे देखिल उपस्थित होते. भाजपाने कोणतेही नाव चर्चेत जाहीर केले नसल्यामुळे सहमतीचा प्रश्नच येत नाही असे आझाद यांनी बैठकीबाबत बोलताना सांगितले.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 14 जुलै रोजी संपत असून नव्या राष्ट्रपतींसाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 28 जून असून 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्यास अवधी असेल. सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांनी आतापर्यंत कोणाचेही नाव उमेदवारीसाठी जाहीर केलेले नाही. यामुळे भावी राष्ट्रपतींबाबत विविध नावांची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेक नावांची याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले दोन दिवस मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांचेही नाव पुढे येत होते मात्र श्रीधरन यांनीही स्वतःच अशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी यापुर्वीच रा .स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते, तर त्यानंतर डॉ.स्वामीनाथन यांना आपली पसंती असल्याचे स्पष्ट केले. मात्र अद्याप सरकारतर्फे कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

भाजपातर्फे उभ्या केल्या जाणाऱ्या उमेदवाराला आपला पाठिंबा असेल तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने जाहीर केले आहे. "एम.जी. रामचंद्रन आणि पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचे केंद्राशी नेहमीच सौहार्दपुर्ण संबंध राहिले आहेत. जयललिता नेहमीच कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे." असे अण्णाद्रमुकचे नेते आणि लोकसभेचे उपसभापती तंबी दुराई यांनी पाठिंब्याबाबत बोलताना सांगितले. अण्णाद्रमुकसह वायएसआर कॉंग्रेसनेही रालोआच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.