शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

सर्व उपग्रह मार्चपर्यंत कक्षेत स्थिरावणार

By admin | Updated: October 9, 2015 00:39 IST

क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.

बंगळुरू : क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.केवळ भारतासभोवतालच्या सर्व देशांना नव्हे, तर संपूर्ण जगाला सिग्नल यंत्रणा पुरविण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे इस्रोचे अध्या ‘गगन’ यंत्रणा असलेले दोन उपग्रह कार्यरत असून चार दिशादर्शक उपग्रह अंतराळातून डाटा पुरवत आहेत. जीसॅट-१५ हा गगन पेलोड लावलेल्या नव्या उपग्रहाचे १० नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण होणार आहे. सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा आहे. यामुळे देश अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. इस्रोच्या उपग्रह केंद्रात जागतिक दिशादर्शक उपग्रह यंत्रणा वापरकर्त्यांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (वृत्तसंस्था) जगभरात व्याप्ती वाढविणारउपग्रह कक्षेत स्थिरावल्यानंतर आम्ही अन्य देशांसोबत कार्य करीत यंत्रणेची व्याप्ती जगभरात वाढविणार आहोत. सध्या ही यंत्रणा १५०० कि.मी. पलीकडे सिग्नल पोहोचविण्याचे काम करीत आहे. आणखी काही भूभाग जोडत संपूर्ण जग व्यापणे शक्य होणार आहे. सध्या कोरिया आणि आखाती देशांसोबत चर्चा केली जात आहे. हळहळू विस्तार वाढविला जाईल. त्यासाठी दशकापेक्षाही कमी काळ लागेल. भारतीय उपखंडातील वस्तूंची स्थिती, वेग आणि वेळेसह सर्व माहिती पुरविण्यासह स्वतंत्र उपग्रह दिशादर्शक यंत्रणा पुरविण्यासाठी इस्रोने पुढाकार घेतला आहे. सात उपग्रहांच्या एकत्रित यंत्रणेमुळे जमिनीवर मोठे नेटवर्क उपलब्ध करवून देता येईल,असे कुमार यांनी नमूद केले.