शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

स्वातंत्र्य दिनासाठी देशभर चोख सुरक्षा

By admin | Updated: August 15, 2015 01:49 IST

अतिरेकी समुद्रमार्गे येऊन २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याची किंवा काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट किंवा त्याचे अपहरण केले जाण्याची

नवी दिल्ली : अतिरेकी समुद्रमार्गे येऊन २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याची किंवा काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट किंवा त्याचे अपहरण केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला जात आहे. विशेषत: भाजपच्या कार्यालयांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने हल्ले हाणून पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून एअर इंडियाच्या दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण किंवा त्यात स्फोट घडविण्यासारखे प्रकार घडविले जाऊ शकतात, असे गुप्तचर सूत्रांनी म्हटले होते. अतिरेकी हवाई मार्गांचा अवलंब करू शकतात, पॅराग्लायडर्सचा वापर करून हल्ले घडविण्याची शक्यता पाहता गृहमंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. घातपात घडवून व्हीआयपींना लक्ष्य केले जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. अल-काईदाने भारतीय उपखंडात कारवाया वाढविल्या असून ही अतिरेकी संघटना भारतावर हल्ले घडवू शकते, अशी माहिती एप्रिलमध्ये गुप्तचर सूत्रांनी मिळविली होती. अलीकडेच गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुरेशी खबरदारी घेतली जात असली तरी इंडियन मुजाहिदीनसारख्या पाकिस्तानी संघटनांकडून किंवा सिमीच्या जुन्या सदस्यांकडून हल्ल्यांचा धोका कमी झालेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)