शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानची सगळी यंत्रणा

By admin | Updated: October 18, 2016 04:44 IST

पाकिस्तानची सगळी यंत्रणा ही दहशतवादाला खतपाणी घालणारी आहे, असा हल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला.

चंदीगढ : पाकिस्तानची सगळी यंत्रणा ही दहशतवादाला खतपाणी घालणारी आहे, असा हल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला. ज्यांनी साप पाळले ते त्यांना चावणारच, असे ते म्हणाले. पाकपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारत आहे, पण पाक नागरिकांच्या विरुद्ध नाही. दहशतवादाचे कारखाने नष्ट करण्यासाठी मोहीम चालविण्यासाठी मदत देण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले. संपादकांच्या परिषदेत ते येथे बोलत होते. अहमदाबादमध्ये बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, पाककडून युद्धविरामांचे उल्लंघन होत असून त्याला आपले लष्कर चोख प्रतिउत्तर देत आहे, सर्जिकल स्ट्राईक्सने देशाच्या सुरक्षेबद्दल भारतीयांच्या मनात संवेदनशीलता वाढवली आहे. सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे द्या अशी मागणी अगदी पहिल्या दिवसापासून काही राजकारणी करीत आहेत, असे सांगून पर्रीकर म्हणाले की लष्कर जर काही सांगत असेल तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ‘नो अवर आर्मी’ कार्यक्रमात ते बोलत होते. पर्रीकर म्हणाले. (वृत्तसंस्था)>परिस्थिती सुधारताच सीआरपीएफ बरॅकमध्येकाश्मीरमध्ये निमलष्कर दल हे नाईलाजाने तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यावर त्यांना बराकमध्ये (जवानांचे निवासाचे ठिकाण) परत पाठविले जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, आंदोलकांकडून होत असलेली तोडफोड आणि वाहनांना लक्ष्य केले जात असल्याने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाला (सीआरपीएफ) तैनात करण्यात आले आहे. अशा घटनेत शहरात परिमपोरा येथे एका मुलीचा मृत्यू झाला.परिस्थिती सुधारल्यानंतर आणि तोडफोडीच्या घटना कमी झाल्यानंतर सुरक्षा दलाची भूमिकाच कमी होईल. त्यामुळे त्यांना परत पाठविले जाईल. मूळात निमलष्करी दलाची नेमणूक ही सुरक्षेच्या दृष्टीने केली जाते. मुलांच्या भविष्याकडे पाहून पालकांनी सरकारला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पुढील महिन्यात परीक्षा आयोजित करण्याच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले जात असल्याबाबत त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठीच परीक्षा वेळेवर घेण्यात येत आहेत. प्रसंगी आम्ही ट्यूशनची व्यवस्था करू. पण, परीक्षा वेळेवरच घेतल्या जातील. राज्यातील महिला आणि मुली यांच्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली. महिलांसाठी वेगळी बससेवा, पोलीस स्टेशनही सुरू केले आहेत. तसेच, लाडली योजना सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या मुली आॅटोरिक्षाने प्रवास करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्कूटी खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. >अनेक दुकाने उघडली काश्मिरात सोमवारीही सामान्य जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही. तथापि, प्रदीर्घ बंदला लोक कंटाळल्याची चिन्हे आहेत. फुटीरवाद्यांचे आवाहन धुडकावत शहराच्या आतील भागांत अनेक दुकाने उघडण्यात आज आली होती, तसेच रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढल्याचेही दिसून आले. लाल चौकातून जाणाऱ्या टीआरसी क्रॉसिंग रोडवर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल लावले होते. रस्त्यांवरील खासगी वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.