शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

चर्चेसाठी दिवसभर बसेन; मोदींवरील ‘हल्ले’ थांबवा

By admin | Updated: November 3, 2015 02:14 IST

असहिष्णुतेच्या मुद्यावर व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबाबत माझी संबंधितांशी संपूर्ण दिवसभर बसून चर्चेची तयारी आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील शाब्दिक हल्ले थांबवा, असे खुले

नवी दिल्ली : असहिष्णुतेच्या मुद्यावर व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबाबत माझी संबंधितांशी संपूर्ण दिवसभर बसून चर्चेची तयारी आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील शाब्दिक हल्ले थांबवा, असे खुले आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी पुरस्कारवापसी आणि निषेध नोंदविणाऱ्या नामवंत लेखक आणि कलावंतांना केले आहे.वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावर सरकारवर होत असलेली टीका शांत करण्याच्या उद्देशाने आवाहन करताना ते म्हणाले की, प्रत्येक बाबीवर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी दिवसभर बसेन. ते चर्चेसाठी समोर येत असल्यास मी त्यांचे स्वागत करेन. लेखक आणि कलावंतांना दिलेले हे अधिकृत निमंत्रण समजायचे काय? त्यावर राजनाथसिंह म्हणाले, होय, मी तयार आहे. त्यांनी चिंता स्पष्ट कराव्यात. त्यांनी काही सूचना केल्यास मी त्यांचे स्वागतच करेन. संगीतात अविश्वास दूर करण्याची शक्ती -अमजद अलीसंगीतात ऐक्य आणि प्रेमाची भावना बळकट करण्यासह अविश्वासाचे वातावरण दूर करण्याची क्षमता आहे, असे प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांनी सोमवारी स्पष्ट केले. संगीत हे मनुष्याची मने जोडण्याचे एक माध्यम आहे. त्याद्वारे सर्व प्रकारचे आपपर भेद मिटू शकतात, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘हर चीज में पीएम को टार्गेट बनाने का मतलब हमारी समझ में नहीं आ रहा है.’ मी अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार आहे. त्यांनी मला लक्ष्य बनवावे. पंतप्रधान ही एक संस्था आहे. पंतप्रधानांवर शाब्दिक हल्ले केल्यामुळे देशाला लाभ होणार नाही.राजनाथसिंह, केंद्रिय गृहमंत्रीवादात शाहरुख खानचीही उडी : तर ‘सांकेतिक रूपात’ पुरस्कार परत करणारमुंबई : देशातील कथित असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी कलावंत, लेखक, चित्रपट निर्माते आणि शास्त्रज्ञांकडून आपले पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असताना आता या वादात बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान यानेही उडी घेतली आहे. देशात असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गरज पडल्यास ‘सांकेतिक रूपात’ मीही पुरस्कार परत करू शकतो. पण तूर्तास तरी माझ्यापुढे तशी स्थिती आहे, असे मला वाटत नाही, असे पद्मश्रीप्राप्त शाहरुख सोमवारी म्हणाला.शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले आहे कि, देशात असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक विचार न करता बोलत आहेत. आपला देश एक धर्मनिरपेक्ष देश आहे, याचा कुठलाही विचार न करता ते बोलत सुटले आहेत. नवा भारत, आधुनिक भारत, विकास अशा सगळ्यांबाबत आपण बोलतो; पण प्रत्यक्षात या सर्व बाताच ठरतात.