शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

चर्चेसाठी दिवसभर बसेन; मोदींवरील ‘हल्ले’ थांबवा

By admin | Updated: November 3, 2015 02:14 IST

असहिष्णुतेच्या मुद्यावर व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबाबत माझी संबंधितांशी संपूर्ण दिवसभर बसून चर्चेची तयारी आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील शाब्दिक हल्ले थांबवा, असे खुले

नवी दिल्ली : असहिष्णुतेच्या मुद्यावर व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबाबत माझी संबंधितांशी संपूर्ण दिवसभर बसून चर्चेची तयारी आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील शाब्दिक हल्ले थांबवा, असे खुले आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी पुरस्कारवापसी आणि निषेध नोंदविणाऱ्या नामवंत लेखक आणि कलावंतांना केले आहे.वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावर सरकारवर होत असलेली टीका शांत करण्याच्या उद्देशाने आवाहन करताना ते म्हणाले की, प्रत्येक बाबीवर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी दिवसभर बसेन. ते चर्चेसाठी समोर येत असल्यास मी त्यांचे स्वागत करेन. लेखक आणि कलावंतांना दिलेले हे अधिकृत निमंत्रण समजायचे काय? त्यावर राजनाथसिंह म्हणाले, होय, मी तयार आहे. त्यांनी चिंता स्पष्ट कराव्यात. त्यांनी काही सूचना केल्यास मी त्यांचे स्वागतच करेन. संगीतात अविश्वास दूर करण्याची शक्ती -अमजद अलीसंगीतात ऐक्य आणि प्रेमाची भावना बळकट करण्यासह अविश्वासाचे वातावरण दूर करण्याची क्षमता आहे, असे प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांनी सोमवारी स्पष्ट केले. संगीत हे मनुष्याची मने जोडण्याचे एक माध्यम आहे. त्याद्वारे सर्व प्रकारचे आपपर भेद मिटू शकतात, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘हर चीज में पीएम को टार्गेट बनाने का मतलब हमारी समझ में नहीं आ रहा है.’ मी अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार आहे. त्यांनी मला लक्ष्य बनवावे. पंतप्रधान ही एक संस्था आहे. पंतप्रधानांवर शाब्दिक हल्ले केल्यामुळे देशाला लाभ होणार नाही.राजनाथसिंह, केंद्रिय गृहमंत्रीवादात शाहरुख खानचीही उडी : तर ‘सांकेतिक रूपात’ पुरस्कार परत करणारमुंबई : देशातील कथित असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी कलावंत, लेखक, चित्रपट निर्माते आणि शास्त्रज्ञांकडून आपले पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असताना आता या वादात बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान यानेही उडी घेतली आहे. देशात असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गरज पडल्यास ‘सांकेतिक रूपात’ मीही पुरस्कार परत करू शकतो. पण तूर्तास तरी माझ्यापुढे तशी स्थिती आहे, असे मला वाटत नाही, असे पद्मश्रीप्राप्त शाहरुख सोमवारी म्हणाला.शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले आहे कि, देशात असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक विचार न करता बोलत आहेत. आपला देश एक धर्मनिरपेक्ष देश आहे, याचा कुठलाही विचार न करता ते बोलत सुटले आहेत. नवा भारत, आधुनिक भारत, विकास अशा सगळ्यांबाबत आपण बोलतो; पण प्रत्यक्षात या सर्व बाताच ठरतात.