धैर्यशील शिक्षण संस्थेने घेतले एळवण गाव दत्तक
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
अकोला : महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र असलेले एळवण हे गाव धैर्यशील शिक्षण संस्थेच्यावतीने दत्तक घेण्यात आले आहे. हे गाव आदर्श करण्यासाठी संस्थेने संकल्प केला आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे.
धैर्यशील शिक्षण संस्थेने घेतले एळवण गाव दत्तक
अकोला : महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र असलेले एळवण हे गाव धैर्यशील शिक्षण संस्थेच्यावतीने दत्तक घेण्यात आले आहे. हे गाव आदर्श करण्यासाठी संस्थेने संकल्प केला आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. एळवण गावचे गावकरी व धैर्यशील शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गाव आदर्श करण्यात येत आहे. गावाने घेतलेल्या ठरावात राज्य शासनाच्या सर्व योजना गावामध्ये राबविणे, लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे, निर्मलग्राम योजना राबविणे, पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविणे, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान तसेच शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना राबविणे, स्वच्छ व सुंदर अंगणवाडी व शाळा करणे, विविध स्पर्धा घेणे आदींचा समावेश आहे. एळवण गावाची लोकसंख्या १ हजार एवढी आहे. गावाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. धैर्यशील शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष मंदाताई देशमुख, सरपंच पद्मा टोबरे, उपसरपंच सुनंदा कोरडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नाजुकराव चोरपगार, पोलीस पाटील दुर्गा उइके, माजी पोलीस पाटील, दयाराम कोरडे, श्रीकृष्ण उईके, ग्रा.पं. सदस्य लीलाबाई अडाम आदी उपस्थित होेते.