शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

आळंदीचा कचराप्रश्न हरित न्यायालयात

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

आळंदी : इंद्रायणी नदीच्या पात्रालगत कचरा टाकणे, तो जागेवरच जाळणे किंवा तोच कचरा नदीत ढकलून देणे, नदीपात्रात सांडपाणी खुलेआम सोडून संपूर्ण इंद्रायणी नदीलाच प्रदूषित करणार्‍या विवध संस्थांसह संबंधित शासकीय कार्यालये व शासनाच्या विरोधात राष्ट्रीत हरित न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणी जलद गतीने सुनावणी सुरू आहे. याबाबत त्वरित निर्णय घेण्याच्या दृष्टीने आळंदी नगर परिषदेने गुरुवारी विशेष सभेचे आयोजन केले होते.

आळंदी : इंद्रायणी नदीच्या पात्रालगत कचरा टाकणे, तो जागेवरच जाळणे किंवा तोच कचरा नदीत ढकलून देणे, नदीपात्रात सांडपाणी खुलेआम सोडून संपूर्ण इंद्रायणी नदीलाच प्रदूषित करणार्‍या विवध संस्थांसह संबंधित शासकीय कार्यालये व शासनाच्या विरोधात राष्ट्रीत हरित न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणी जलद गतीने सुनावणी सुरू आहे. याबाबत त्वरित निर्णय घेण्याच्या दृष्टीने आळंदी नगर परिषदेने गुरुवारी विशेष सभेचे आयोजन केले होते.
आळंदी येथील संदीप कायस्थ यांनी दावा क्र. ६२/२१५ पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायालयात (नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल) दाखल केला असून, यात आळंदी नगर परिषद, पिंपरी-चिंचवड महापालिका, लोणावळा नगर परिषद, देहू ग्रामपंचायत, पुणे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, नगर विकास विभाग, जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
दाखल करण्यात आलेल्या दाव्यामध्ये संदीप कायस्थ यांनी आळंदी न.प.द्वारे गोळा करण्यात आलेला कचरा स्मशानभूमीत टाकला जात असून, हा कचरा तिथेच नदीकाठी साठवला जातो, नदीत ढकलून दिला जातो, तिथेच जागेवर जाळला जातो, घनकचरा व्यवस्थापन कचरा कायदा २००० नुसार घन कचर्‍याचे व्यवस्थापन केले जात नाही, तसेच इंद्रायणी नदीच्या पात्रात आळंदी न.प. हद्दीतील,पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील, लोणारा न.प., तळेगाव न.प., देहू ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सांडपाणी बेसुमार व खुले आम सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदी या सर्वच कारणांमुळे भयंकर प्रदूषित होत असल्याचे दाव्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आलेली शौचालये नागरिकांना वापरासाठी खुली करुन दिली जात नाही, असाही आक्षेप घेण्यात आला आहे. शिवाय तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत घेतलेल्या कुंड्या, कंटेनर, घंटागाड्या, झेटींग मशीन याचा वापर केला जात नाही. देवस्थानने न.प.ला ५ एकर जागा भा्याने उपलब्ध करुन दिली असली तरी, नगर परिषदेला जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्यापही ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे दाव्यामध्ये नमुद करण्यात आले आहे. याबाबत दाव्यासोबत संदीप कायस्थ यांनी विविध ठिकाणची पुरावादर्शक छधायाचित्रेही दाखल केली आहेत.
सदर प्रकरणी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायालयात सुनावणी सुरू असून यातील दोन सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर .... जोड....