शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करणा-या अक्षय कुमारचे राजनाथ सिंहांनी मानले आभार

By admin | Updated: March 17, 2017 14:09 IST

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने सुकमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे आभार मानले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारने सुकुमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या आर्थिक मदतीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे आभार मानले आहेत. राजनाथ सिंह यांनी अक्षय कुमारचं कौतुक करत मदत केल्याप्रकरणी आभार प्रकट केले आहेत. सुकुमा येथे 11 मार्च रोजी माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारने 9 लाखांची मदत दिली आहे. 
 
(छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, 11 जवान शहीद)
 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनेनंतर लगेचच अक्षय कुमारने गृहमंत्रालयाशी संपर्क साधला होता. आर्थिक मदत करता यावी यासाठी अक्षयने शहिदांच्या कुटुंबीयांचं बँक खातं क्रमांक पुरवण्याची विनंती केली. मंत्रालयाने त्यांची विनंती स्वीकार करत सीआरपीएफमधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांची बँक खाती क्रमांक पुरवण्याचे आदेश दिले होते. 
 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जेव्हा यासंबंधी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ट्विट करत अक्षय कुमारचं कौतुक केलं. 'तुम्ही दाखवलेला उदारपणा नक्कीच स्तुत्य आहे. तुमचं हे पाऊल इतरांनाही पुढे येऊन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची प्रेरणा देईल', असं राजनाथ सिंह म्हणालेत. 
 
राजनाथ सिंह एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. 'सुकुमातील शहीद जवानांसाठी आर्थिक मदत करणा-या अक्षय कुमारचे मी आभार मानतो', असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामासाठी, देशभक्ती आणि माणुसकी जपणारा अभिनेता यासाठी ओळखला जातो. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबीयांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मदत करण्याचे अक्षय कुमारने जाहीर केले. गुरुवारी अक्षयने त्यांच्या कुटुंबीयाच्या खात्यावर नऊ लाख रुपये पाठवले. सीआरपीएफनेही निवेदन जारी करत अक्षय कुमारने देश आणि विशेष करुन सीआरपीएफसाठी आपली देशभक्ती दाखवून दिली असल्याचं म्हटलं आहे. 
 
दरम्यान, अक्षय कुमारने याआधी भारतीय लष्कराच्या जवानांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे सरसावला होता. त्याने दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली होती.