शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी अक्षयने मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 13:44 IST

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमने-सामने होते. लॉर्ड्सवर पार पडलेल्या या सामन्याला खिलाडी अक्षय कुमारने उपस्थिती लावली होती. यावेळी अक्षय कुमारने तिरंगा हातात घेतला होता. चुकीच्या पद्धतीने तिरंगा फडकावल्याने अक्षय कुमारवर टीकेची झोड उठली होती, ज्यानंतर त्याने माफी मागितली आहे. 
संबंधित बातम्या
हेही नसे थोडके!
पराभवानंतर कर्णधार मिताली राजने जाहीर केला मोठा निर्णय
Women In Blue : दिगज्जांकडून हळहळ आणि कौतुक!
 
खिलाडी अक्षय कुमारने आपला एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये अक्षय कुमार अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला चिअर करताना दिसत होता. यावेळी त्याच्या हातात तिरंगादेखील होता. मात्र तिरंगा फडकवत असताना तो उलटा पकडला असल्याने सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. ते ट्विट अक्षय कुमारने डिलीट केलं आहे. 
 
अक्षय यासंबंधी एक नवीन ट्विट करत माफी मागितली आहे. "तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी मी माफी मागत आहे. कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. फोटो काढून टाकण्यात आला आहे", असं अक्षय कुमारने ट्विटमध्ये सांगितलं आहे. 
अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट "गोल्ड"साठी शूटिंग करत आहे. भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या पहिल्या सुवर्णपदकाची कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. 
 
विश्वविजयाचे स्वप्न भंगले! अंतिम लढतीत भारतीय महिला संघ पराभूत
 
महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न मात्र भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. महिला विश्वचषकातील इंग्लंडचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे.
 
संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर हातातील विश्वविजेतेपद गमावण्याची वेळ आली. प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले. मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही. अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला