शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी अक्षयने मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 13:44 IST

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमने-सामने होते. लॉर्ड्सवर पार पडलेल्या या सामन्याला खिलाडी अक्षय कुमारने उपस्थिती लावली होती. यावेळी अक्षय कुमारने तिरंगा हातात घेतला होता. चुकीच्या पद्धतीने तिरंगा फडकावल्याने अक्षय कुमारवर टीकेची झोड उठली होती, ज्यानंतर त्याने माफी मागितली आहे. 
संबंधित बातम्या
हेही नसे थोडके!
पराभवानंतर कर्णधार मिताली राजने जाहीर केला मोठा निर्णय
Women In Blue : दिगज्जांकडून हळहळ आणि कौतुक!
 
खिलाडी अक्षय कुमारने आपला एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये अक्षय कुमार अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला चिअर करताना दिसत होता. यावेळी त्याच्या हातात तिरंगादेखील होता. मात्र तिरंगा फडकवत असताना तो उलटा पकडला असल्याने सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. ते ट्विट अक्षय कुमारने डिलीट केलं आहे. 
 
अक्षय यासंबंधी एक नवीन ट्विट करत माफी मागितली आहे. "तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी मी माफी मागत आहे. कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. फोटो काढून टाकण्यात आला आहे", असं अक्षय कुमारने ट्विटमध्ये सांगितलं आहे. 
अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट "गोल्ड"साठी शूटिंग करत आहे. भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या पहिल्या सुवर्णपदकाची कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. 
 
विश्वविजयाचे स्वप्न भंगले! अंतिम लढतीत भारतीय महिला संघ पराभूत
 
महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न मात्र भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. महिला विश्वचषकातील इंग्लंडचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे.
 
संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर हातातील विश्वविजेतेपद गमावण्याची वेळ आली. प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले. मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही. अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला