शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
3
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
4
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
5
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
6
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
7
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
8
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
9
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
10
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
11
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
12
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
13
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
14
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
15
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
16
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
17
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
18
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
19
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
20
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी अक्षयने मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 13:44 IST

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमने-सामने होते. लॉर्ड्सवर पार पडलेल्या या सामन्याला खिलाडी अक्षय कुमारने उपस्थिती लावली होती. यावेळी अक्षय कुमारने तिरंगा हातात घेतला होता. चुकीच्या पद्धतीने तिरंगा फडकावल्याने अक्षय कुमारवर टीकेची झोड उठली होती, ज्यानंतर त्याने माफी मागितली आहे. 
संबंधित बातम्या
हेही नसे थोडके!
पराभवानंतर कर्णधार मिताली राजने जाहीर केला मोठा निर्णय
Women In Blue : दिगज्जांकडून हळहळ आणि कौतुक!
 
खिलाडी अक्षय कुमारने आपला एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये अक्षय कुमार अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला चिअर करताना दिसत होता. यावेळी त्याच्या हातात तिरंगादेखील होता. मात्र तिरंगा फडकवत असताना तो उलटा पकडला असल्याने सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. ते ट्विट अक्षय कुमारने डिलीट केलं आहे. 
 
अक्षय यासंबंधी एक नवीन ट्विट करत माफी मागितली आहे. "तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी मी माफी मागत आहे. कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. फोटो काढून टाकण्यात आला आहे", असं अक्षय कुमारने ट्विटमध्ये सांगितलं आहे. 
अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट "गोल्ड"साठी शूटिंग करत आहे. भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या पहिल्या सुवर्णपदकाची कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. 
 
विश्वविजयाचे स्वप्न भंगले! अंतिम लढतीत भारतीय महिला संघ पराभूत
 
महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न मात्र भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. महिला विश्वचषकातील इंग्लंडचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे.
 
संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर हातातील विश्वविजेतेपद गमावण्याची वेळ आली. प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले. मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही. अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला