शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

भाजपामुक्त भारतासाठी सपा-काँग्रेस एकत्र - अखिलेश

By admin | Updated: February 2, 2017 12:51 IST

'जोपर्यंत देश भाजपामुक्त करत नाही तोपर्यंत सपा-काँग्रेस युती कायम राहील' असा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर हल्ला चढवला.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २ - 'जोपर्यंत देश भाजपामुक्त करत नाही तोपर्यंत सपा-काँग्रेस युती कायम राहील' असा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर हल्ला चढवला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. गाझियाबादमधील धौलाना भागातील एका सभेत बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. 
२०१४ लोकसभा निवडणुकीपासून भाजपाने ' काँग्रेसमुक्त' भारताचा नारा देत प्रचार सुरू केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता अखिलेश यांनी ' भाजपामुक्त भारत' अशी घोषणा दिली आहे. 'त्यांनी (भाजपा) शक्य होईल तेवढे विष, तेढ, द्वेष पसरवला आहे' अशी टीका अखिलेश यांनी केली. 'मात्र देशात सपाचे सरकार आल्यावर देशाची परिस्थिती बदलेल. आणि बदल घडवण्यासाठी जे कष्ट सहन करावे लागतील ते आम्ही करू. वाटेत कितीही अडचणी आल्या तरी आम्ही त्या पार करू. त्यासाठी आम्हाला काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागली, तर तेही आम्ही करू' असे अखिलेश यांनी नमूद केले. 
(उत्तर प्रदेशात उमलणार कमळ, टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला 202 जागा)
(उत्तर प्रदेशमध्ये सायकल रोखणार कमळाची आगेकूच?)
 
 
'दोन्ही पक्षातील (सपा-काँग्रेस) नेत्यांचे विचार समान आहेत. जोपर्यंत आम्ही देशातून भाजपा आणि जातीयवादी पक्ष नष्ट करत नाही., तोपर्यंत आम्ही एकत्र काम करू. त्यामुळेच ते ( भाजपा व इतर पक्ष) आमच्या (सपा-काँग्रेस) युतीला घाबरले आहेत. त्यांना माहीत आहे की, जर त्यांचा उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला तर राष्ट्रीय राजकारणातही ते पराभूत होतील. त्यामुळेच ही निवडणूक अतिशय महत्वाची, प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीमुळे उत्तर प्रदेश आणि देशाचे राजकारण बदलणार आहे' असेही अखिलेश यांनी सांगितले. 
उत्तर प्रदेशमध्ये ७ टप्प्यात निवडणूक पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील तर ८ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ११ मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल घोषित होणार आहे.