शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भाजपामुक्त भारतासाठी सपा-काँग्रेस एकत्र - अखिलेश

By admin | Updated: February 2, 2017 12:51 IST

'जोपर्यंत देश भाजपामुक्त करत नाही तोपर्यंत सपा-काँग्रेस युती कायम राहील' असा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर हल्ला चढवला.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २ - 'जोपर्यंत देश भाजपामुक्त करत नाही तोपर्यंत सपा-काँग्रेस युती कायम राहील' असा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर हल्ला चढवला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. गाझियाबादमधील धौलाना भागातील एका सभेत बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. 
२०१४ लोकसभा निवडणुकीपासून भाजपाने ' काँग्रेसमुक्त' भारताचा नारा देत प्रचार सुरू केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता अखिलेश यांनी ' भाजपामुक्त भारत' अशी घोषणा दिली आहे. 'त्यांनी (भाजपा) शक्य होईल तेवढे विष, तेढ, द्वेष पसरवला आहे' अशी टीका अखिलेश यांनी केली. 'मात्र देशात सपाचे सरकार आल्यावर देशाची परिस्थिती बदलेल. आणि बदल घडवण्यासाठी जे कष्ट सहन करावे लागतील ते आम्ही करू. वाटेत कितीही अडचणी आल्या तरी आम्ही त्या पार करू. त्यासाठी आम्हाला काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागली, तर तेही आम्ही करू' असे अखिलेश यांनी नमूद केले. 
(उत्तर प्रदेशात उमलणार कमळ, टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला 202 जागा)
(उत्तर प्रदेशमध्ये सायकल रोखणार कमळाची आगेकूच?)
 
 
'दोन्ही पक्षातील (सपा-काँग्रेस) नेत्यांचे विचार समान आहेत. जोपर्यंत आम्ही देशातून भाजपा आणि जातीयवादी पक्ष नष्ट करत नाही., तोपर्यंत आम्ही एकत्र काम करू. त्यामुळेच ते ( भाजपा व इतर पक्ष) आमच्या (सपा-काँग्रेस) युतीला घाबरले आहेत. त्यांना माहीत आहे की, जर त्यांचा उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला तर राष्ट्रीय राजकारणातही ते पराभूत होतील. त्यामुळेच ही निवडणूक अतिशय महत्वाची, प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीमुळे उत्तर प्रदेश आणि देशाचे राजकारण बदलणार आहे' असेही अखिलेश यांनी सांगितले. 
उत्तर प्रदेशमध्ये ७ टप्प्यात निवडणूक पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील तर ८ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ११ मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल घोषित होणार आहे.