शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

अखिलेश इतका कुणीही माझा अपमान केला नाही - मुलायम सिंह

By admin | Updated: April 1, 2017 17:32 IST

जो स्वतःच्या वडिलांचा होऊ शकला नाही तो दुस-या कुणाचाही होऊ शकत नाही, अशी बोचरी टीका मुलाय सिंह यादवांनी अखिलेश यादव यांच्यावर केली आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 1 - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे.   
 
जो आपल्या वडिलांचा होऊ शकला नाही तो दुसऱ्या कुणाचाही होऊ शकत नाही, अशा शब्दात मुलायम यांनी अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  मेनपुरी येथील पार्टीतील कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुलायम सिंह यादव यांनी हे विधान केलं आहे. 
 
शिवाय,यापूर्वी माझा एवढा अपमान कधीही झाला नव्हता. मी अखिलेशला मुख्यमंत्री बनवलं मात्र त्यानं माझं काहीही एक ऐकलं नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
 
मुलायम सिंह यांनी भारतीय राजकारणाचं उदाहरण देत सांगितले की, कोणत्याही बापाने स्वतः राजकारणात असताना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवल्याचे मी पाहिले नाही. अखिलेशनं काका शिवपाल सिंह यांनाही मंत्री पदावरुन हटवलं, असं सांगत त्यांनी भाऊ शिवपाल सिंह यादव यांचा झालेल्या अपमानाबाबतही यावेळी  भाष्य केलं. 
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यांनी पार्टीत तख्ता पालट करत एक विशेष राष्ट्रीय अधिवेशन बोलावलं होतं. यावेळी त्यांनी स्वतःला पक्षाचे अध्यक्ष व वडील मुलायम सिंह यादव यांना पक्षाचे संरक्षक म्हणून घोषित केलं होतं. तर काका शिवपाल सिंह यादव यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर हटवलं होतं. याशिवाय अमर सिंह यांनाही बाहेर रस्ता दाखवला होता. या बदलानंतर जवळपास दोन महिन्यांपर्यंत पक्ष आणि यादव कुटुंबात दंगल सुरू होती. 
 
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांच्याकडून मुलायम सिंह यांना बाजूला सारण्यात आल्यानं पक्षाला निवडणुकीत हार पत्करावी लागली, असे अनेक सपा नेत्यांचं म्हणणं आहे.  तर दुसरीकडे अखिलेश यांनी पक्ष प्रमुखाचा पदभार स्वीकारताना, "मला माझ्या वडिलांचा खूप आदर आहे", असे म्हटलं होते. मात्र निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवडे झाले तरी आतापर्यंत दोघांमध्ये साधा संवादही घडला नसल्याची माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, राज्यातील निवडणुकीतील पराभवाला अखिलेश जबाबदार नाही, असं मुलायम सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.  शिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी  सोहळ्यावेळी मुलायम सिंह यादव अखिलेश यांचा हात धरुन व्यासपीठावर पोहोचले होते.
 
विशेष म्हणजे, "अखिलेशची काळजी घ्या", असे मुलायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात पुटपुटले होते, अशीही माहिती समोर आली आहे.