शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

अकबर महान राजा नव्हता, ते तर परप्रांतीयच - राजस्थानचे शिक्षणमंत्री

By admin | Updated: April 10, 2015 12:37 IST

अकबर हे महान राजा नसून ते तर बाहेरुन आलेले राजा होते असे विधान राजस्थानचे शिक्षण मंत्री वासूदेव देवनानी यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

जयपूर, दि. १० - अकबर हे महान राजा नसून ते तर बाहेरुन आलेले राजा होते असे विधान राजस्थानचे शिक्षण मंत्री वासूदेव देवनानी यांनी केले आहे.  देशभरातील शाळांमध्ये शिकवल्या जाणा-या इतिहासात आपण मुलांना परदेशातून आलेल्या राजांचीच माहिती देतो. याऐवजी आपण महाराणा प्रताप, आर्यभट्ट या सारख्या भारतीयांची माहिती द्यायला हवी असे  देवनानी यांनी म्हटले आहे. 
राजस्थानमधील शाळांमधील पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना केली जाणार असून यात आता जास्तीत जास्त भारतीय राजा, संशोधक, वैज्ञानिक, गणिततज्ज्ञ यांचा समावेश केला जाणार आहे. यावरुन वाद निर्माण झाला असून याविषयी राजस्थानचे शिक्षण मंत्री वासूदेव देवनानी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये देवनानी यांनी अकबर हे महान राजे नव्हते, ते तर परप्रांतातून आलेले होते असे म्हटले आहे. अशा परदेशातून आलेल्यांमुळेच देशात स्वातंत्र्य चळववळ झाली असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. अकबर पेक्षा महाराणा प्रताप थोर होते. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अकबर, न्यूटन यासारख्या व्यक्तींवर एक धडा आहे. पण महाराणा प्रताप किंवा आर्यभट्ट यांच्यावर आधारित एकही धडा नाही असा दावाही त्यांनी केला. परदेशातील थोर राजे व संशोधकांसोबतच भारतातील थोर राजे, संशोधक, वैज्ञानिक यांचीही माहिती विद्यार्थ्यांना द्यायला हवी असे त्यांनी नमूद केले. राजस्थानमधील शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून यावरुनही देवनानी यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.