शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

औरंगाबादहून लवकरच देशातील महानगरांमध्ये विमानसेवा; केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 09:36 IST

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : औरंगाबाद येथील देशातील प्रमुख महानगरांमध्ये जाण्यासाठी लवकरच हवाई मार्गाने जोडले जाणार असून यामुळे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला नवी संजीवनी मिळेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला.लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची  भेट घेतली. यावेळी डॉ. कराड यांनी औरंगाबाद व मराठवाडा विभागाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या औरंगाबाद येथून विमानसेवा योग्यरीतीने नसल्याने विकासाला चालना मिळत नाही, तसेच लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी निदर्शनास आणून दिले. याबद्दल बोलताना डॉ. कराड म्हणाले, औरंगाबाद येथून देशातील इतर महानगरांमध्ये जाण्यासाठी अडचणी येत आहेत. या अडचणींवर मात करीत आता दोन विमान कंपन्यांनी औरंगाबाद येथून महानगरांमध्ये विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडान या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेडची फ्लाय बिग व प्रसिद्ध उद्योजक राकेश झुनझुनवाला यांची आकासा एअर कंपन्यांनी औरंगाबादहून महानगरांमध्ये विमानसेवा देण्याची हमी दिली आहे. यामुळे औरंगाबादहून आता मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगलुरू, कोल्हापूर, नांदेड या शहरांमध्ये  थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे. 

औरंगाबाद येथेच बेस राहीलऔरंगाबाद येथे बेस तयार करून या महानगरांमध्ये विमानांची ये-जा केली जाणार आहे. यासाठी मुंबई व पुणे हे गर्दीचे विमानतळ आहे. या विमानतळांवर विमानांना उतरण्यासाठी वेळ देण्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.  यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आहे. शिर्डी येथे दररोज १२ पेक्षा अधिक विमाने उतरतात.  

औरंगाबादला बुद्धिस्ट हेरिटेजशी जोडावे - सुनीत कोठारीबोधगया, सारनाथ, बनारस, कुशीनगर येथे येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद येथे येण्यासाठी बुद्धिस्ट हेरिटेजशी औरंगाबादला जोडण्याची आवश्यकता आहे. यामुळे विदेशातील पर्यटकसुद्धा औरंगाबाद येथे येतील, अशी सूचना सिव्हिल एव्हिएशन कमिटी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी केली.  ते म्हणाले, बौद्ध धर्माचे लोक असलेले अनेक पर्यटक येतात. या साखळीत औरंगाबादला जोडले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. 

राजेंद्र दर्डा यांच्या कार्याचा उल्लेखकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या विकासाला चालना दिली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद विमानतळाचा विस्तार झाल्याचा डॉ. भागवत कराड यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. या विमानतळाच्या विकासाला सध्या आळा बसला आहे. या नव्या योजनांमुळे राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या या दूरदृष्टीच्या विकासाला चांगले फळ येईल, असेही विजय दर्डा यावेळी म्हणाले.

बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांची औरंगाबाद येथे बैठककेंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा लोकांना व्हावा व बँकिंग क्षेत्राचा लाभ आदिवासी व ग्रामीण भागापर्यंत नेण्यामध्ये नेमक्या काय अडचणी येत आहे, यावर चर्चा करण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला औरंगाबाद येथे सार्वजनिक उपक्रम व खासगी क्षेत्रातील बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक आयोजित करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे अर्थसचिव, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, नाबार्ड, सिडकोचे अधिकारी व सार्वजनिक उपक्रमातील १२ बँकांचे व खासगी क्षेत्रातील २२ बँकांचे मुख्य महाव्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवत