शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

विमान प्रवाशांची आता बूट काढून तपासणी

By admin | Updated: March 26, 2016 01:05 IST

ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा संस्थांनी देशाच्या संवेदनशील विमानतळांवरील सुरक्षा बंदोबस्त अधिक कडक केला आहे. प्रवाशांची कसून चौकशी केली जात असून त्यांना

नवी दिल्ली : ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा संस्थांनी देशाच्या संवेदनशील विमानतळांवरील सुरक्षा बंदोबस्त अधिक कडक केला आहे. प्रवाशांची कसून चौकशी केली जात असून त्यांना बूट आणि बेल्टही काढण्यास सांगितले जात आहे.दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादसारख्या प्रमुख विमानतळांवर सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी सुरक्षा कवच अधिक बळकट केले आहे. सेकंडरी लँडर पॉर्इंट चेकच्या (एसलीपीएस) माध्यमाने विमानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची झाडझडती घेतली जाते. क्षेत्रात तैनात गस्ती पथकाला अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठलाही प्रवासी सखोल तपासणीशिवाय टर्मिनल क्षेत्रात दाखल होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. विमानतळ सुरक्षेत तैनात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा सुरक्षा मोहिमांमध्ये जास्तीची कुमक तैनात केली जात असते. केंद्रीय गुप्तचर संस्थांद्वारे ज्या स्तरावरील धोक्याचे संकेत दिले जातील त्या आधारे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीत बदल केले जातील. प्रवाशांजवळ असलेले सामान आणि विमानात चढविल्या जाणाऱ्या सामानांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाईल. विद्यमान सुरक्षा परिस्थिती आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांचे आकलन लक्षात घेऊन तपासणीसंदर्भात निर्देश देण्यात आले असल्याचे सांगून हा अधिकारी म्हणाला की, विमानतळ परिसरातील पाळत वाढविण्यासाठी विविध ठिकाणांवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कमांडोंची जलद कृती पथके (क्युआरटीएस) आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)विमानतळांवर विशेष पथके, बॉम्बस्क्वाड आणि श्वान पथक सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.भारतात नागरी उड्डयनासाठी विमानतळावर प्रवेशापूर्वी सर्व प्रवाशांची तपासणी होत नाही. या ठिकाणांवर कुठल्याही संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील सुरक्षा जवान तैनात केले जात आहेत. सर्व संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर ब्रसेल्स हल्ला आणि होळी लक्षात घेऊन अलर्ट जारी करण्यात आला आहे.