शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विमान, मेट्रो आणि बससेवेचेही वेधजाहीरनामा.

By admin | Updated: February 15, 2017 17:19 IST

नाही चालवता येत घंटागाडी, कशी चालवता येईल बस गाडी...

नाशिक : नाही चालवता येत घंटागाडी, कशी चालवता येईल बस गाडी... गेल्या पाच ते दहा वर्षांत अशाप्रकारच्या भूमिका मांडून विरोध झालेल्या शहर बस वाहतुकीला ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि सेना आसुसलेले आहेत. महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत आत्तापर्यंत किमान पाच वेळा बससेवा ताब्यात घेण्याचे प्रस्ताव फेटाळले गेल्यानंतर आता पुन्हा बससेवेची भुरळ भाजप- सेनेला पडली आहे.नाशिक महापालिकेत १९९२ साली लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली, त्यावेळी सर्व प्रथम बससेवा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी परिवहन समितीची स्थापना करण्यासाठी निवडणूक घोषित झाली. परंतु त्यावेळच्या सत्तारूढ कॉँग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाल्याने हा विषय फेटाळण्यात आला. त्यानंतर आजवर हा विषय डॉ. शोभा बच्छाव (कॉँग्रेस), विनायक पांडे (शिवसेना), नयना घोलप (शिवसेना), अ‍ॅड. यतिन वाघ (मनसे) या महापौरांच्या कारकिर्दीत मांडण्यात आला आणि फेटाळला गेला होता. विनायक पांडे महापौर असताना तर इंदूर येथील बससेवेचा पहाणी दौरा काढण्यात आला होता. जेथे शासकीय सार्वजनिक वाहतूक सेवाच नव्हती, तेथे हा विषय नावीन्य आणि आकर्षणाचा ठरला. परंतु महाराष्ट्रात एसटी महामंडळ चांगली सेवा देत असल्याने खासगीकरण करायचे नाही, असे ठरवत अखेरीस हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि महापालिकेला बस खरेदीसाठी नेहरू अभियानातून शंभर बस खरेदी करण्यासाठी देण्यात येणारा निधी एसटी महामंडळाला वर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा काही स्वयंसेवी संथांनी बीआरटीएस हा सार्वजनिक वाहतुकीचा नवा प्रस्ताव मांडला. त्यानुसार अहमदाबाद येथील बीआरटीएस सेवेचा अभ्यास करण्यासाठी मंडळे पाठविण्यात आली. परंतु एकतर ही सेवा तोट्यात आणि दुसरे म्हणजे बससाठी स्वतंत्र मार्गिका करण्यासाठी लागणारे रुंद रस्ते याबाबत मतभेद असल्याने राज ठाकरे यांनीच हा विषय गुंडाळून ठेवण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यावेळी बससेवेला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. त्याच शिवसेनेला सीएनजी बस सुरू करण्याचा नवा मुद्दा सापडला आहे.