शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विमान, मेट्रो आणि बससेवेचेही वेधजाहीरनामा.

By admin | Updated: February 15, 2017 17:19 IST

नाही चालवता येत घंटागाडी, कशी चालवता येईल बस गाडी...

नाशिक : नाही चालवता येत घंटागाडी, कशी चालवता येईल बस गाडी... गेल्या पाच ते दहा वर्षांत अशाप्रकारच्या भूमिका मांडून विरोध झालेल्या शहर बस वाहतुकीला ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि सेना आसुसलेले आहेत. महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत आत्तापर्यंत किमान पाच वेळा बससेवा ताब्यात घेण्याचे प्रस्ताव फेटाळले गेल्यानंतर आता पुन्हा बससेवेची भुरळ भाजप- सेनेला पडली आहे.नाशिक महापालिकेत १९९२ साली लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली, त्यावेळी सर्व प्रथम बससेवा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी परिवहन समितीची स्थापना करण्यासाठी निवडणूक घोषित झाली. परंतु त्यावेळच्या सत्तारूढ कॉँग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाल्याने हा विषय फेटाळण्यात आला. त्यानंतर आजवर हा विषय डॉ. शोभा बच्छाव (कॉँग्रेस), विनायक पांडे (शिवसेना), नयना घोलप (शिवसेना), अ‍ॅड. यतिन वाघ (मनसे) या महापौरांच्या कारकिर्दीत मांडण्यात आला आणि फेटाळला गेला होता. विनायक पांडे महापौर असताना तर इंदूर येथील बससेवेचा पहाणी दौरा काढण्यात आला होता. जेथे शासकीय सार्वजनिक वाहतूक सेवाच नव्हती, तेथे हा विषय नावीन्य आणि आकर्षणाचा ठरला. परंतु महाराष्ट्रात एसटी महामंडळ चांगली सेवा देत असल्याने खासगीकरण करायचे नाही, असे ठरवत अखेरीस हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि महापालिकेला बस खरेदीसाठी नेहरू अभियानातून शंभर बस खरेदी करण्यासाठी देण्यात येणारा निधी एसटी महामंडळाला वर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा काही स्वयंसेवी संथांनी बीआरटीएस हा सार्वजनिक वाहतुकीचा नवा प्रस्ताव मांडला. त्यानुसार अहमदाबाद येथील बीआरटीएस सेवेचा अभ्यास करण्यासाठी मंडळे पाठविण्यात आली. परंतु एकतर ही सेवा तोट्यात आणि दुसरे म्हणजे बससाठी स्वतंत्र मार्गिका करण्यासाठी लागणारे रुंद रस्ते याबाबत मतभेद असल्याने राज ठाकरे यांनीच हा विषय गुंडाळून ठेवण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यावेळी बससेवेला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. त्याच शिवसेनेला सीएनजी बस सुरू करण्याचा नवा मुद्दा सापडला आहे.