शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

एअर इंडियात गोंधळ घातला तर आता 15 लाख दंड !

By admin | Updated: April 17, 2017 19:18 IST

गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे. गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे.  गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर 2 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 लाखाचा दंड आकारण्याची तयारी एअर इंडिया करत आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  गेल्या महिन्यात एअरइंडियाच्या एका कर्मचा-यासोबत शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर एअर इंडिया गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. लवकरच हा नियम लागू होऊ शकतो. या नियमानुसार गोंधळ घालणा-या प्रवाशाची लगेच पोलिसात तक्रार केली जाणार आहे.
 
याशिवाय विमानाला 1 तास उशीर झाल्यास 5 लाख आणि 2 तास उशीर झाल्यास 15 लाखांचा दंड आकारण्याचा नियम एअर इंडिया आणणार आहे. पण जर कोणत्याही चुकीशिवाय म्हणजे एअर इंडियामुळेच जर विमानाला उशीर झाला तर कोणत्याही दंडाची तरतूद नाही. एअर इंडियाशिवाय अन्य विमान कंपन्याही असा नियम बनववणार असल्याचं वृत्त आहे.
 
यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांच्या विमानप्रवासामुळे वादंग निर्माण झाला होता. त्यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी हटवण्यात आली होती.