शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

एअर इंडियात गोंधळ घातला तर आता 15 लाख दंड !

By admin | Updated: April 17, 2017 19:18 IST

गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे. गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे.  गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर 2 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 लाखाचा दंड आकारण्याची तयारी एअर इंडिया करत आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  गेल्या महिन्यात एअरइंडियाच्या एका कर्मचा-यासोबत शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर एअर इंडिया गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. लवकरच हा नियम लागू होऊ शकतो. या नियमानुसार गोंधळ घालणा-या प्रवाशाची लगेच पोलिसात तक्रार केली जाणार आहे.
 
याशिवाय विमानाला 1 तास उशीर झाल्यास 5 लाख आणि 2 तास उशीर झाल्यास 15 लाखांचा दंड आकारण्याचा नियम एअर इंडिया आणणार आहे. पण जर कोणत्याही चुकीशिवाय म्हणजे एअर इंडियामुळेच जर विमानाला उशीर झाला तर कोणत्याही दंडाची तरतूद नाही. एअर इंडियाशिवाय अन्य विमान कंपन्याही असा नियम बनववणार असल्याचं वृत्त आहे.
 
यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांच्या विमानप्रवासामुळे वादंग निर्माण झाला होता. त्यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी हटवण्यात आली होती.