शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

टाटा विकत घेणार आजारी एअर इंडिया?

By admin | Updated: June 22, 2017 05:53 IST

सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखविले असल्याचे वृत्त आहे.एका इंग्रजी वृत्तवाहिनेने हे वृत्त देताना म्हटले की, सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे ५१ टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सरकारी पातळीवर प्राथमिक स्वरूपाची बोलणीही केली आहेत.खासगी विमान कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू न शकलेल्या एअर इंडियाचा कारभार रुळावर आणण्यासाठी सरकारने कंपनीला ३० हजार कोटी रुपये देण्याचे ठरविले. त्यापैकी २४ हजार कोटी रुपये दिलेही आहेत. तरीही गळक्या हौदात पाणी ओतत राहून उपयोग नसल्याची सरकारला खात्री पटल्याने, वित्तमंत्री अरुण जेटली व विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. एअर इंडियाचे मोठे कर्ज हा टाटांसाठीही काळजीचा विषय आहे, पण टाटांसारखा उद्योगसमूह सुकाणू हाती घेणार असल्यास, विक्रीपूर्वी हा बोजा कमी करण्यावरही सरकार अनुकूल असल्याचे समजते.सिंगापूर एअरलाइन्स आणि मलेशियाची एअर एशिया यांच्या भागीदारीत अनुक्रमे ‘विस्तारा’ व ‘एअर एशिया इंडिया’ कंपन्या सुरू करून, टाटा समूह भारताच्या नागरी विमान वाहतूक उद्योगात शिरला आहेच.वर्तुळाचे पूर्णचक्र!एअर इंडिया खरेच टाटांकडे आल्यास ही कंपनी सुमारे ७० वर्षांनी मूळ मालकाकडे परत येईल. या कंपनीचा ‘टाटा एअरलाइन्स’हा अवतार जेआरडी टाटांनी १९३२मध्ये सुरू केला. स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी सरकार व खासगी भागीदारीत ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ झाली. नंतर सरकारने विमान वाहतूक उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्याने, ‘एअर इंडिया’ सरकारी झाल्याने टाटा त्यातून बाहेर पडले.गेल्या १० वर्षांत एअर इंडियाची प्रवासीसंख्या २० टक्क्यांनी कमी झाली असली, तरी अजूनही त्यांचा वाटा १४ टक्क्यांचा आहे. टाटांना ही जमेची बाजू वाटते. निष्णात व्यावसायिक व्यवस्थापनाची जोड देऊन ही कंपनी चालविल्यास सौदा नफ्याचा ठरू शकेल, असेही टाटांना वाटते.