शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

टाटा विकत घेणार आजारी एअर इंडिया?

By admin | Updated: June 22, 2017 05:53 IST

सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखविले असल्याचे वृत्त आहे.एका इंग्रजी वृत्तवाहिनेने हे वृत्त देताना म्हटले की, सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे ५१ टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सरकारी पातळीवर प्राथमिक स्वरूपाची बोलणीही केली आहेत.खासगी विमान कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू न शकलेल्या एअर इंडियाचा कारभार रुळावर आणण्यासाठी सरकारने कंपनीला ३० हजार कोटी रुपये देण्याचे ठरविले. त्यापैकी २४ हजार कोटी रुपये दिलेही आहेत. तरीही गळक्या हौदात पाणी ओतत राहून उपयोग नसल्याची सरकारला खात्री पटल्याने, वित्तमंत्री अरुण जेटली व विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. एअर इंडियाचे मोठे कर्ज हा टाटांसाठीही काळजीचा विषय आहे, पण टाटांसारखा उद्योगसमूह सुकाणू हाती घेणार असल्यास, विक्रीपूर्वी हा बोजा कमी करण्यावरही सरकार अनुकूल असल्याचे समजते.सिंगापूर एअरलाइन्स आणि मलेशियाची एअर एशिया यांच्या भागीदारीत अनुक्रमे ‘विस्तारा’ व ‘एअर एशिया इंडिया’ कंपन्या सुरू करून, टाटा समूह भारताच्या नागरी विमान वाहतूक उद्योगात शिरला आहेच.वर्तुळाचे पूर्णचक्र!एअर इंडिया खरेच टाटांकडे आल्यास ही कंपनी सुमारे ७० वर्षांनी मूळ मालकाकडे परत येईल. या कंपनीचा ‘टाटा एअरलाइन्स’हा अवतार जेआरडी टाटांनी १९३२मध्ये सुरू केला. स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी सरकार व खासगी भागीदारीत ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ झाली. नंतर सरकारने विमान वाहतूक उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्याने, ‘एअर इंडिया’ सरकारी झाल्याने टाटा त्यातून बाहेर पडले.गेल्या १० वर्षांत एअर इंडियाची प्रवासीसंख्या २० टक्क्यांनी कमी झाली असली, तरी अजूनही त्यांचा वाटा १४ टक्क्यांचा आहे. टाटांना ही जमेची बाजू वाटते. निष्णात व्यावसायिक व्यवस्थापनाची जोड देऊन ही कंपनी चालविल्यास सौदा नफ्याचा ठरू शकेल, असेही टाटांना वाटते.