शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांच्या विक्रीवर हवा अंकुश

By admin | Updated: May 21, 2014 22:19 IST

तेल्हारा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बळीराजा शेतीच्या मशागतीस आणि बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीस लागला आहे. बाजारात विविध प्रकारचे बियाणे व रासायनिक खते येण्यास सुरुवात झाली आहे. दुकानदारांकडून आतापासूनच खते व बियाण्यांच्या टंचाईचा आभास निर्माण केला जात आहे. बोगस बियाण्यांची विक्री करण्यात तेल्हारा शहर व तालुका आघाडीवर असल्याने कृषी विभागाने बोगस बियाण्यांचा शोध लावणे तसेच बियाणे व खतांच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यासाठी ग्रामीण भागातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

तेल्हारा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बळीराजा शेतीच्या मशागतीस आणि बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीस लागला आहे. बाजारात विविध प्रकारचे बियाणे व रासायनिक खते येण्यास सुरुवात झाली आहे. दुकानदारांकडून आतापासूनच खते व बियाण्यांच्या टंचाईचा आभास निर्माण केला जात आहे. बोगस बियाण्यांची विक्री करण्यात तेल्हारा शहर व तालुका आघाडीवर असल्याने कृषी विभागाने बोगस बियाण्यांचा शोध लावणे तसेच बियाणे व खतांच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यासाठी ग्रामीण भागातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.
तालुक्यात मध्य प्रदेशातून आलेल्या बोगस बियाण्यांचा व्यापार करणारे एक मोठे रॅकेटच सक्रिय आहे. या बोगस बियाण्यांची विक्री करताना दुकानदार शेतकर्‍यांना त्या मालाची पावती देत नाहीत. किंमत कमी असते म्हणून विनापावती बियाणे घेतलेल्या शेतकर्‍यांना ते बियाणे बोगस असल्याचे पेरणी केल्यानंतर लक्षात येते. फसगत झालेल्या शेतकर्‍यांवर महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणीचे संकट येते. मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा व्यापार होत असला तरी कृषी विभागाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कृषिसेवा केंद्रांवर बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये म्हणून प्रत्येक दुकानांवर कृषी विभागाचा कर्मचारी ठेवण्यात येत असल्याचे कागदी घोडे नाचविले जातात; मात्र प्रत्यक्षात या दुकानांमध्ये कृषी विभागाचा कर्मचारी दिसून येत नाही. कृषी व्यावसायिकांची गोदामे शहरात तर आहेतच शिवाय ग्रामीण भागातही गोदामांचे मोठ्या प्रमाणात जाळे असल्याने खते व बियाण्यांचा काळाबाजार दरवर्षीच होत असल्याचे एकंदरित चित्र आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बियाणे येत असताना या बियाण्यांचा तुटवडा असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्यामुळे शेतकरी चढ्या दराने बियाणे खरेदी करून मोकळे होत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे; परंतु प्रत्यक्षात या विभागाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांची लूट थांबविण्यासाठी कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन करण्याची गजर आहे. शिवाय दक्ष राहून काळाबाजारावर नियंत्रण मिळविण्याचीही गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
--------
कोट
तालुक्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होता कामा नये, यासाठी कृषी विभाग आवश्यक ती काळजी घेत आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई केली जाईल.
- रामराजे घोळवे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा