शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

बोगस बियाण्यांच्या विक्रीवर हवा अंकुश

By admin | Updated: May 21, 2014 22:19 IST

तेल्हारा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बळीराजा शेतीच्या मशागतीस आणि बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीस लागला आहे. बाजारात विविध प्रकारचे बियाणे व रासायनिक खते येण्यास सुरुवात झाली आहे. दुकानदारांकडून आतापासूनच खते व बियाण्यांच्या टंचाईचा आभास निर्माण केला जात आहे. बोगस बियाण्यांची विक्री करण्यात तेल्हारा शहर व तालुका आघाडीवर असल्याने कृषी विभागाने बोगस बियाण्यांचा शोध लावणे तसेच बियाणे व खतांच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यासाठी ग्रामीण भागातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

तेल्हारा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बळीराजा शेतीच्या मशागतीस आणि बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीस लागला आहे. बाजारात विविध प्रकारचे बियाणे व रासायनिक खते येण्यास सुरुवात झाली आहे. दुकानदारांकडून आतापासूनच खते व बियाण्यांच्या टंचाईचा आभास निर्माण केला जात आहे. बोगस बियाण्यांची विक्री करण्यात तेल्हारा शहर व तालुका आघाडीवर असल्याने कृषी विभागाने बोगस बियाण्यांचा शोध लावणे तसेच बियाणे व खतांच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यासाठी ग्रामीण भागातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.
तालुक्यात मध्य प्रदेशातून आलेल्या बोगस बियाण्यांचा व्यापार करणारे एक मोठे रॅकेटच सक्रिय आहे. या बोगस बियाण्यांची विक्री करताना दुकानदार शेतकर्‍यांना त्या मालाची पावती देत नाहीत. किंमत कमी असते म्हणून विनापावती बियाणे घेतलेल्या शेतकर्‍यांना ते बियाणे बोगस असल्याचे पेरणी केल्यानंतर लक्षात येते. फसगत झालेल्या शेतकर्‍यांवर महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणीचे संकट येते. मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा व्यापार होत असला तरी कृषी विभागाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कृषिसेवा केंद्रांवर बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये म्हणून प्रत्येक दुकानांवर कृषी विभागाचा कर्मचारी ठेवण्यात येत असल्याचे कागदी घोडे नाचविले जातात; मात्र प्रत्यक्षात या दुकानांमध्ये कृषी विभागाचा कर्मचारी दिसून येत नाही. कृषी व्यावसायिकांची गोदामे शहरात तर आहेतच शिवाय ग्रामीण भागातही गोदामांचे मोठ्या प्रमाणात जाळे असल्याने खते व बियाण्यांचा काळाबाजार दरवर्षीच होत असल्याचे एकंदरित चित्र आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बियाणे येत असताना या बियाण्यांचा तुटवडा असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्यामुळे शेतकरी चढ्या दराने बियाणे खरेदी करून मोकळे होत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे; परंतु प्रत्यक्षात या विभागाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांची लूट थांबविण्यासाठी कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन करण्याची गजर आहे. शिवाय दक्ष राहून काळाबाजारावर नियंत्रण मिळविण्याचीही गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
--------
कोट
तालुक्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होता कामा नये, यासाठी कृषी विभाग आवश्यक ती काळजी घेत आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई केली जाईल.
- रामराजे घोळवे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा