शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आरोपांची ‘हवाबाजी’ !

By admin | Updated: September 11, 2015 05:37 IST

काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले

भोपाळ : काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या ‘हवाबाजी’च्या टीकेला प्रत्युत्तर दिले.जीएसटी पारित होऊ न दिल्याचा उल्लेख करीत मोदींनी काँग्रेसवर थेट हल्ला चढविला. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि लोकशाहीच्या मार्गात हवालाबाजांनी अडचणी आणल्या आहेत. काळ््या पैशासंबंधी कठोर कायद्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. सोनिया गांधी यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीला संबोधित करताना मोदींनी निवडणूक प्रचाराच्यावेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ ठरली, असे टीकास्त्र सोडले होते. त्यावर मोदी भोपाळ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, हवालाबाज (घोटाळेबाज) आमच्याकडे उत्तर मागत आहे. आमच्या सरकारने अनेक योजनांमधील पळवाटा रोखत देशाचा खजिना समृद्ध केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेसला अद्यापही सावरता आलेले नाही. त्यामुळेच या पक्षाने खोळंबा करण्याचे तंत्र अवलंबले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे वाया गेले. जीएसटी विधेयक लांबणीवर पडण्यासाठी हा पक्षच जबाबदार आहे. अन्य पक्षांना सभागृह चालावे, कामकाज व्हावे असे वाटत होते. केवळ काँग्रेसला ते मान्य नव्हते. मग्रुरीतून आलेल्या संघर्षाच्या वृत्तीला लोकशाहीत स्थान आहे काय? जनतेने ज्यांना नाकारले, पराभूत केले अशा पक्षांना मी संसदेचे कामकाज चालू द्यावे असे आवाहन जाहीररीत्या केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) या प्रकरणी मोदी गप्प का?विदेशमंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांबाबत मोदी एक शब्दही बोलले नाहीत. ते आता गप्प का? असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. आमच्या सरकारने हवालाबाजांच्या नाड्या आवळल्या आहेत, असे मोदींनी म्हटले होते. सोनिया गांधी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर असून त्यांनी येथे स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. मोदींच्या विधानाबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती.हवाबाज, दगाबाज हे जनतेने दिलेले संबोधननिवडणुकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोक सत्तेवर आल्यानंतर सर्व काही विसरल्यामुळे देशातील जनता त्यांना हवाबाज आणि दगाबाज असे संबोधत आहे, असे काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख रणदीपसिंग सूरजेवाला यांनी दिल्लीत म्हटले आहे.