शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

आरोपांची ‘हवाबाजी’ !

By admin | Updated: September 11, 2015 05:37 IST

काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले

भोपाळ : काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या ‘हवाबाजी’च्या टीकेला प्रत्युत्तर दिले.जीएसटी पारित होऊ न दिल्याचा उल्लेख करीत मोदींनी काँग्रेसवर थेट हल्ला चढविला. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि लोकशाहीच्या मार्गात हवालाबाजांनी अडचणी आणल्या आहेत. काळ््या पैशासंबंधी कठोर कायद्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. सोनिया गांधी यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीला संबोधित करताना मोदींनी निवडणूक प्रचाराच्यावेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ ठरली, असे टीकास्त्र सोडले होते. त्यावर मोदी भोपाळ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, हवालाबाज (घोटाळेबाज) आमच्याकडे उत्तर मागत आहे. आमच्या सरकारने अनेक योजनांमधील पळवाटा रोखत देशाचा खजिना समृद्ध केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेसला अद्यापही सावरता आलेले नाही. त्यामुळेच या पक्षाने खोळंबा करण्याचे तंत्र अवलंबले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे वाया गेले. जीएसटी विधेयक लांबणीवर पडण्यासाठी हा पक्षच जबाबदार आहे. अन्य पक्षांना सभागृह चालावे, कामकाज व्हावे असे वाटत होते. केवळ काँग्रेसला ते मान्य नव्हते. मग्रुरीतून आलेल्या संघर्षाच्या वृत्तीला लोकशाहीत स्थान आहे काय? जनतेने ज्यांना नाकारले, पराभूत केले अशा पक्षांना मी संसदेचे कामकाज चालू द्यावे असे आवाहन जाहीररीत्या केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) या प्रकरणी मोदी गप्प का?विदेशमंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांबाबत मोदी एक शब्दही बोलले नाहीत. ते आता गप्प का? असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. आमच्या सरकारने हवालाबाजांच्या नाड्या आवळल्या आहेत, असे मोदींनी म्हटले होते. सोनिया गांधी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर असून त्यांनी येथे स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. मोदींच्या विधानाबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती.हवाबाज, दगाबाज हे जनतेने दिलेले संबोधननिवडणुकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोक सत्तेवर आल्यानंतर सर्व काही विसरल्यामुळे देशातील जनता त्यांना हवाबाज आणि दगाबाज असे संबोधत आहे, असे काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख रणदीपसिंग सूरजेवाला यांनी दिल्लीत म्हटले आहे.