शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

‘अग्नी-५’ची पल्लेदार झेप

By admin | Updated: January 31, 2015 23:54 IST

भारताने ५००० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शनिवारी यशस्वी चाचणी घेतली.

यशस्वी चाचणी : ५ हजार कि.मी.पर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमताबालासोर : भारताने ५००० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शनिवारी यशस्वी चाचणी घेतली. अंदाजे एक टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राने ओडिशाच्या व्हिलर बेटावरून आकाशात यशस्वी झेप घेतली. हे क्षेपणास्त्र सडक अथवा रेल्वे मार्गाने कोणत्याही ठिकाणी वाहून नेले जाऊ शकते आणि कोणत्याही ठिकाणावरून डागता येते.सकाळी ८.०६ वाजता इंटेग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स-४ वरून मोबाईल लाँचरद्वारा हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, अशी माहिती आयटीआरचे संचालक एम.व्ही.के.व्ही. प्रसाद यांनी दिली. आजची चाचणी अत्याधुनिक सचल प्रक्षेपकाद्वारे करण्यात आली. हे प्रक्षेपक (लाँचर) सडक मार्गाने कोणत्याही स्थळी नेले जाऊ शकते. खुल्या प्रक्षेपणाच्या तुलनेत हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी वेळाच्या तयारीत डागले जाऊ शकते. विश्वसनीयता, दीर्घायुष्य, देखभालीचा कमी खर्च आणि कोणत्याही भागात नेण्याची क्षमता हे या प्रक्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य आहे. डीआरडीओचे मावळते महासंचालक अविनाश चंदर म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण आहे. कॅनिस्टरद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले हे भारताचे पहिलेच आयसीबीएम आहे. देशाच्या प्रतिरोधक क्षमतेसाठी ही मोठी उपलब्धी आहे.’ (वृत्तसंस्था)‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ‘स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्रात नवे तंत्रज्ञान वापरण्यात आल्याचे ऐकून मला मोठा आनंद झाला आहे. तुमच्या या अथक परिश्रमासाठी देश सदैव आभारी राहील. या देशाला तुमचा अभिमान आहे,’ असे मुखर्जी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.डीआरडीओचे महासंचालक आणि संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार अविनाश चंदर यांना पाठविलेल्या एका संदेशात म्हटले आहे.