शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अग्नि-३ ची यशस्वी चाचणी

By admin | Updated: April 16, 2015 23:54 IST

भारताने गुरुवारी ओडिशाच्या लष्करी तळावर अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नि-३ या स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

बालासोर (ओडिशा) : भारताने गुरुवारी ओडिशाच्या लष्करी तळावर अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नि-३ या स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या व्हिलर बेटावर सकाळी ९ वाजून ५५ मिनिटाला जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र डागले गेले. काहीच क्षणात त्याने अचूक लक्ष्यभेद केला. स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र ३००० कि.मी.वरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. ही नेहमीची उपयोजित चाचणी असल्याचे, आयटीआर संचालक एम.व्ही.के.व्ही. प्रसाद यांनी सांगितले. ही चाचणी अग्नि-३ शृंखलेची तिसरी चाचणी असल्याचे संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्य अधिकाऱ्याने सांगितले.१७ मीटर लांब या क्षेपणास्त्राचा व्यास दोन मीटर आहे. प्रक्षेपणावेळी याचे वजन सुमारे ५० टन आहे. हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत १.५ टन अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. लष्करात आधीच समाविष्ट करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रवर अत्याधुनिक हायब्रिड दिशादर्शक, मार्गदर्शक व नियंत्रण प्रणाली लागलेल्या आहेत. अग्नि-३ चे पहिले विकासात्मक परीक्षण ९ जुलै २००६ रोजी करण्यात आले होते. मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. यानंतर १२ एप्रिल २००७, ७ मे २००८ आणि ७ फेबु्रवारी २०१० रोजी याच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. २१ सप्टेंबर २०१२ रोजी अग्नि-३ ची पहिली उपयोजित चाचणी पार पडली. यानंतर २३ डिसेंबर २०१३ रोजी दुसरी चाचणीही यशस्वी राहिली.