शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
3
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
4
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
5
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
6
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
7
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
9
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
10
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
11
Astro Tip: सकाळी झोपून उठल्यावर म्हणा 'हा' पॉवरफुल मंत्र; २१ दिवसात मार्गी लागेल काम!
12
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
13
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
14
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
15
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
17
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
18
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
19
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
20
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

एन्काऊंटरवर विरोधक आक्रमक

By admin | Updated: November 1, 2016 02:39 IST

सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली

नबीन सिन्हा,

नवी दिल्ली- भोपाळजवळ चकमकीत सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. भाजपने अशाप्रकारचा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सुरक्षा दलाचे नीतीधैर्य दडपणे ठरते, असा आरोप करीत प्रत्युत्तर दिले आहे.एआयएमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी हा अल्पसंख्यकांवरील घाला असल्याचे सांगत न्यायालयीन चौकशीची मागणी केली. या प्रकरणी सत्य बाहेर आणण्यासाठी न्यायालयीन चौकशी करावी, असे काँग्रेस आणि माकपनेही म्हटले. काँग्रेस आणि माकप सिमीचे समर्थन करीत असून, या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. काय घडले याबाबत विस्तृत माहिती बाहेर येत आहे. आम्ही अहवालाची प्रतीक्षा करू त्यानंतरच प्रतिक्रिया देऊ, असे काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी म्हटले. अतिरेक्यांनी पलायनाचा कट फार आधीच आखला असावा, अशी शक्यता केंद्रीय गृहमंत्रालय आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अतिरेक्यांकडे कारागृहात शस्त्रे नव्हती. कारागृहाबाहेर पडताच त्यांनी ती कशी मिळविली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.>कोणत्या परिस्थितीत अतिरेकी पळून गेले हे सरकारला कळावे यासाठी मी न्यायालयीन चौकशीची मागणी करीत आहे. अति सुरक्षा असलेल्या कारागृहातून अतिरेकी कसे पळून गेले, काही तासांतच त्यांना कसे पकडण्यात आले आणि ठार मारण्यात आले, ते जनतेला कळायला हवे.- कमलनाथ, काँग्रेसचे खासदार.सिमीचे आठही जण पोलिसांच्या निर्दयतेचे बळी ठरले आहेत. त्यांच्याविरुद्धची प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, मात्र सरकारला त्यांचा दोष सिद्ध करता आलेला नाही. त्याच भीतीपोटी मध्य प्रदेशच्या पोलिसांनी या सर्वांची हत्या केली.- असादुद्दीन ओवेसी, एआयएमआयएमचे नेते.यापूर्वी काँग्रेसने लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांचे समर्थन केले होते. आता हा पक्ष सिमीच्या अतिरेक्यांचे समर्थन करीत आहे. या पक्षाचे नेते सुरक्षा दलाचे नैतिक धैर्य दडपत आहेत.- जीव्हीएल नरसिंह राव, भाजपचे प्रवक्ते.या चकमकीबाबत दिलेली माहिती अतिशय संशयास्पद आहे. सरकार आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या दाव्यातील विसंगती समोर आली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.- वृंदा करात, माकपच्या नेत्या.याआधी खंडवा कारागृहातून अतिरेकी पळून गेले होते. हे पहिल्यांदाच घडले नाही. मध्य प्रदेशातच पुनरावृत्ती घडावी, हे आश्चर्यकारक आहे.- ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेसचे खासदार.