शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

एन्काऊंटरवर विरोधक आक्रमक

By admin | Updated: November 1, 2016 02:39 IST

सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली

नबीन सिन्हा,

नवी दिल्ली- भोपाळजवळ चकमकीत सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. भाजपने अशाप्रकारचा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सुरक्षा दलाचे नीतीधैर्य दडपणे ठरते, असा आरोप करीत प्रत्युत्तर दिले आहे.एआयएमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी हा अल्पसंख्यकांवरील घाला असल्याचे सांगत न्यायालयीन चौकशीची मागणी केली. या प्रकरणी सत्य बाहेर आणण्यासाठी न्यायालयीन चौकशी करावी, असे काँग्रेस आणि माकपनेही म्हटले. काँग्रेस आणि माकप सिमीचे समर्थन करीत असून, या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. काय घडले याबाबत विस्तृत माहिती बाहेर येत आहे. आम्ही अहवालाची प्रतीक्षा करू त्यानंतरच प्रतिक्रिया देऊ, असे काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी म्हटले. अतिरेक्यांनी पलायनाचा कट फार आधीच आखला असावा, अशी शक्यता केंद्रीय गृहमंत्रालय आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अतिरेक्यांकडे कारागृहात शस्त्रे नव्हती. कारागृहाबाहेर पडताच त्यांनी ती कशी मिळविली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.>कोणत्या परिस्थितीत अतिरेकी पळून गेले हे सरकारला कळावे यासाठी मी न्यायालयीन चौकशीची मागणी करीत आहे. अति सुरक्षा असलेल्या कारागृहातून अतिरेकी कसे पळून गेले, काही तासांतच त्यांना कसे पकडण्यात आले आणि ठार मारण्यात आले, ते जनतेला कळायला हवे.- कमलनाथ, काँग्रेसचे खासदार.सिमीचे आठही जण पोलिसांच्या निर्दयतेचे बळी ठरले आहेत. त्यांच्याविरुद्धची प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, मात्र सरकारला त्यांचा दोष सिद्ध करता आलेला नाही. त्याच भीतीपोटी मध्य प्रदेशच्या पोलिसांनी या सर्वांची हत्या केली.- असादुद्दीन ओवेसी, एआयएमआयएमचे नेते.यापूर्वी काँग्रेसने लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांचे समर्थन केले होते. आता हा पक्ष सिमीच्या अतिरेक्यांचे समर्थन करीत आहे. या पक्षाचे नेते सुरक्षा दलाचे नैतिक धैर्य दडपत आहेत.- जीव्हीएल नरसिंह राव, भाजपचे प्रवक्ते.या चकमकीबाबत दिलेली माहिती अतिशय संशयास्पद आहे. सरकार आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या दाव्यातील विसंगती समोर आली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.- वृंदा करात, माकपच्या नेत्या.याआधी खंडवा कारागृहातून अतिरेकी पळून गेले होते. हे पहिल्यांदाच घडले नाही. मध्य प्रदेशातच पुनरावृत्ती घडावी, हे आश्चर्यकारक आहे.- ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेसचे खासदार.