शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

..तर दक्षिण मुंबईवर पुन्हा आघाडीचा वरचष्मा?

By admin | Updated: September 23, 2014 02:30 IST

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी

जमीर काझी- मुंबई लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाल्याने येत्या विधानसभेच्या रणसंग्रामात आघाडीच्या उमेदवाराचे पानिपत होण्याची अपेक्षा असताना महायुती फुटल्यास हे चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केल्यास आघाडीला ६ पैकी सध्याच्या ४ जागा राखता येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणाहून सेनेचे अरविंद सावंत पावणेदोन लाखांवर मतांनी विजयी झाले होते. त्यात वरळी मतदारसंघातून त्यांना ३५ हजारांवर मताची आघाडी मिळाली होती. मात्र आता या ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार उभे राहिल्यास गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर सलग चौथ्यांदा सहजपणे निवडून येऊ शकतील. सध्याच्या फॉर्मुल्यानुसार ही जागा सेनेच्या वाट्याला असून त्यांच्याकडून आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपामधूनही त्यासाठी इच्छुक असून त्याचा फायदा अहीर यांना होऊ शकतो. मनसेची हवा नसली तरी त्या उमेदवारीचा फायदा कॉँग्रेस आघाडीला होईल.शिवडी मतदारसंघात प्रतिनिधित्व करीत असलेल्या मनसचे गटनेते बाळा नांदगावकर यांना पुन्हा निवडून येणे अशक्य असल्याने ते पुन्हा रिंगणात उतरण्यास इच्छुक नाहीत. मात्र युती तुटीत असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भायखळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांच्याबद्दल मतदारसंघात उघडपणे नाराजी आहे. विशेषत: मुस्लीम उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. गेल्यावेळी सेना व कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्यात झालेल्या मतविभागणीचा फायदा त्यांना मिळाला होता. या वेळी गवळीची कन्या गीता गवळी इच्छुक असून, सेनानेतृत्व त्यासाठी राजी असल्याचे सांगितले जात आहे. मुस्लीमबहुल मतदार असलेल्या मुंबादेवीमध्ये लोकसभेत कॉँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना २५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार अमीन पटेल पुन्हा निवडून येण्याबाबत आशावादी आहेत. युती तुटल्यास त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. मलबार हिलमध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांचे तिकीट व विजय जवळपास निश्चित आहे. सेनेने या ठिकाणी उमेदवार दिल्यास मात्र त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्याउलट कॉॅँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा फायदा मिळू शकणार आहे. कुलाब्यात कॉँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर यांना गेल्यावेळी भाजपाच्या राज पुरोहितांनी चांगली झुंज दिली होती. मात्र या वेळी स्वतंत्र लढल्यास अ‍ॅनी शेखर यांना त्याचा थेट फायदा होईल. मनसेचे या ठिकाणी स्थान नगण्य आहे.