शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकलनंतर पोलिटिकल वॉर सुरू

By admin | Updated: October 8, 2016 05:37 IST

भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- २८ सप्टेंबरच्या रात्री भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना. भाजपच्या नेतृत्वाने कितीही नकार दिला तरी याबाबीचे ते राजकीय भांडवल करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने भाजपवर टीका करण्यापूर्वी १९७१ च्या युद्धाकडे जरा पाहावे, असा सल्लाही शहांनी दिला आहे. काही उत्साही भाजप जिल्हाध्यक्षांना याबाबत पोस्टरबाजी करण्यास त्यांनी मनाई केली आहे. मात्र, लष्कराच्या कारवाईमागे समर्थ राजकीय इच्छाशक्ती व पाठबळ होते, असे आश्चर्यकारक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. हे कमी म्हणून की काय, भाजपा या घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे, असे दिसते.दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपला या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा मिळू नये, यासाठी सरसावले आहेत. राहुल गांधी यांच्या खून की दलाली या वक्तव्यावरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली असल्याने विरोधकांतही गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसते. भाजपच्या जाळ्यात काँग्रेसने अडकू नये, असे जनता दल (यू)सह काही मित्र पक्षांनी आवाहन केले आहे. प्रशांत किशोर म्हणतात की, या घडीला लष्कराची प्रशंसा करा आणि राजकीय टीका टाळा. राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्ष मुख्यालयात अचानकपणे पत्रकार परिषद घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांच्या रक्ताच्या मागे लपत असून, त्यांच्या बलिदानाचे राजकीय शोषण करीत असल्याचा आरोप राहुल यांनी गुरुवारी केला होता. सर्जिकल स्ट्राईकवरील विधानांवरून अरविंद केजरीवाल अडचणीत आले होते. त्यांच्यावर चोहीकडून टीकेचा भडिमार सुरू होता. राहुल यांच्या विधानांमुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला, असे म्हणता येईल. केजरीवाल यांनी सर्जिकलबाबत केलेली विधाने पाकिस्तानात गाजली. मात्र, त्यामुळे पंजाबमधील त्यांचे समर्थक चिंतातुर झाले आहेत. >केवळ सैन्याचा सत्कार केला पाहिजे...बसपाप्रमुख मायावती यांनीही या वादात उडी घेतली. सर्जिकल स्ट्राइकबाबत केवळ सैन्याचा सत्कार केला गेला पाहिजे ना की पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्याचा, असे त्या म्हणाल्या. स्ट्राइकबद्दल मनोहर पर्रीकर यांचा गुरुवारी मथुरेत सत्कार करण्यात आला. मायावतींचा रोख त्याकडेच होता. >पाकिस्तानचे भारताच्या नावाने बोटे मोडणे सुरूचकाश्मीरमधील जनतेवर सुरक्षा दलांकडून होणाऱ्या अन्याय व अत्याचारांचा निषेध करतानाच, आम्ही काश्मिरी जनतेच्या लढ्यात सोबत आहोत, कारण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही आहे, असा ठराव शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेत एकमताने संमत करण्यात आला. काश्मीरमधील जनतेवरील अत्याचार रोखण्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.