शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

गजेंद्रच्या आत्महत्येनंतर भाषण सुरू ठेवून चूक केली - केजरीवाल

By admin | Updated: April 24, 2015 14:12 IST

किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २४ - किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले. या घटनेबाबत दु:ख व्यक्त  करत यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण व आापला पक्ष तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गजेंद्रने गलफास लावून आयुष्य संपवल्यानंतरही मचावरून अरविंद केजरीवाल व इतर नेत्यांची भाषणं सुरू होती. त्यावरून गदारोळ माजलेला असतानाच आज केजरीवालांनी अखेर आपली चूक कबूल करत माफी मागितली. 'व्यासपीठापासून ते झाड अगदी जवळ होते, मात्र तेथे बॅनर्स लावलेले असल्याने तेथे काय सुरू आहे ते आम्हाला दिसत नव्हते. झाडाजवळ काहीतरी गडबड सुरू असल्याचे आम्हाला जाणवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. त्यावेळी  तेथे काही स्वयंसेवक आणि पोलिसही उपस्थि होते पण गजेंद्र सिंग खरंच आत्महत्या करेल असे कोणालाच वाटले नव्हते. मला मान्य आहे की आत्महत्येच्या घटनेनंतर मी बोलणे थांबवायला हवे होते, मी तसे केले नाही ही चूक झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता आपण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या का करत आहे यावर चर्चा करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  यावेळी त्यांनी मीडियावरही टीकास्त्र सोडले. फक्त टीआरपी मिळवण्यासाठी त्या शेतक-याच्या आत्महत्येच्या घटनेची चित्र दाखवली जात आहेत, त्याविषयी चर्चा केली जात आहे, हे योग्य नव्हे अशी टीका त्यांनी केली. तसेच ही घटना माझ्या डोळ्यासमोरच घडली असून त्यादिवशी रात्रभर झोपू शकलो नसल्याचेही केजरीवाल पुढे म्हणाले.
दरम्यान असे वक्तव्य करत केजरीवाल राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला आहे.