शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गजेंद्रच्या आत्महत्येनंतर भाषण सुरू ठेवून चूक केली - केजरीवाल

By admin | Updated: April 24, 2015 14:12 IST

किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २४ - किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले. या घटनेबाबत दु:ख व्यक्त  करत यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण व आापला पक्ष तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गजेंद्रने गलफास लावून आयुष्य संपवल्यानंतरही मचावरून अरविंद केजरीवाल व इतर नेत्यांची भाषणं सुरू होती. त्यावरून गदारोळ माजलेला असतानाच आज केजरीवालांनी अखेर आपली चूक कबूल करत माफी मागितली. 'व्यासपीठापासून ते झाड अगदी जवळ होते, मात्र तेथे बॅनर्स लावलेले असल्याने तेथे काय सुरू आहे ते आम्हाला दिसत नव्हते. झाडाजवळ काहीतरी गडबड सुरू असल्याचे आम्हाला जाणवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. त्यावेळी  तेथे काही स्वयंसेवक आणि पोलिसही उपस्थि होते पण गजेंद्र सिंग खरंच आत्महत्या करेल असे कोणालाच वाटले नव्हते. मला मान्य आहे की आत्महत्येच्या घटनेनंतर मी बोलणे थांबवायला हवे होते, मी तसे केले नाही ही चूक झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता आपण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या का करत आहे यावर चर्चा करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  यावेळी त्यांनी मीडियावरही टीकास्त्र सोडले. फक्त टीआरपी मिळवण्यासाठी त्या शेतक-याच्या आत्महत्येच्या घटनेची चित्र दाखवली जात आहेत, त्याविषयी चर्चा केली जात आहे, हे योग्य नव्हे अशी टीका त्यांनी केली. तसेच ही घटना माझ्या डोळ्यासमोरच घडली असून त्यादिवशी रात्रभर झोपू शकलो नसल्याचेही केजरीवाल पुढे म्हणाले.
दरम्यान असे वक्तव्य करत केजरीवाल राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला आहे.