शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

संघर्षानंतर किसान मुक्ती यात्रा पुन्हा सुरू

By admin | Updated: July 7, 2017 03:52 IST

स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त करावा, या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र

रमाकांत पाटील/लोकमत न्यूज नेटवर्कमंदसौर (मध्य प्रदेश) : स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त करावा, या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन काढलेली किसान मुक्ती यात्रा मध्य प्रदेश पोलिसांनी पिपलीमंडी गावाजवळ अडवली. सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांना अटक करून तासाभरात सुटका केली. यानंतर या यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. दरम्यान, शनिवारी ८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता लोणखेडा ता. शहादा येथे ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात पिपलीमंडी गावाजवळ ६ जून रोजी शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला होता. त्यातून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या सुमारे दोनशेहून अधिक संघटना एकवटल्या. या संघटनांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना करून ६ जुलैपासून मंदसौर ते दिल्ली अशी किसान मुक्ती यात्रा काढली आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता बुढा या गावापासून या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या मार्गावरच पिंपरीमंडी हे गाव आहे. येथेच श्रद्धांजली सभा होणार होती. परंतु त्यासाठीची परवानगी पोलिसांनी नाकारली. मात्र तरीही त्या ठिकाणी यात्रा निघाली. १० किलोमीटर यात्रा सुरळीत सुरू होती. मात्र पुढे पिपलीमंडी गावाजवळ मध्य प्रदेश पोलिसांनी यात्रा अडविली....म्हणून परवानगी नाकारलीपिपलीमंडी येथे ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्याच ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार होतो. परंतु परवानगी नाकारली. यात्रा सुरळीत राहावी म्हणूनच आम्ही अटक करून घेतली. - व्ही.एम.सिंग, मुख्य समन्वयक किसान मुक्ती यात्रा.देशात सत्ता आल्यास स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. आता दोन वर्षानंतर त्यांनी लागू केला नाही तर २०१९ मध्ये लाल किल्ल्यावर त्यांचे तिरंगा फडकविण्याचे स्वप्न शेतकरी पुर्ण होऊ देणार नाही.- खासदार राजू शेट्टीपिपरीमंडीजवळ शेतकरी, व्यापारी यांच्यातील संघर्ष पुन्हा होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून जमावबंदी आदेश लागू केला.- श्रीवास्तव, जिल्हाधिकारी, मंदसौर.