शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

गीतानंतर पाकिस्तानच्या 'रमझान'चीही होणार घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 10:00 IST

भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ७ - १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या गीताचा ईधी फांऊडेशनच्या बिल्किस ईधींनी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करून तिला गेल्या वर्षी सुखरूपरित्या मायदेशात पाठवले. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे. रमझानचे वडील काही वर्षांपासून बांग्लादेशमध्ये राहत असून त्याला तेथेच पाठवण्यात येईल. 
'रमझान कोलतकात्याला रवाना झाला असून तेथून सनलाप या एनजीओच्या मदतीने त्याला बांगलादेशमध्ये त्याच्या वडिलांकडे धाडण्यात येईल' असे 'उमीद' या आश्रयघराच्या प्रमुख अर्चना सहाय यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून रमझान तेथेच रहात होता. 
रमझान १० वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला बांग्लादेशला घेऊन गेले आणि त्याची आईशी ताटातूट झाली. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर रमजानची सावत्र आई त्याचा छळ करू लागली, या परिस्थितीला कंटाळून पाकिस्तानला आईकडे परत जाण्यासाठी रमझानने २०११ साली बांग्लादेशमधून पळ काढला आणि चुकून सीमा ओलांडून भारतात आला. अनेक राज्यात भटकलेल्या रमझानची २०१३ साली भोपाळ रेल्वे स्थानकावर एका रेल्वे पोलिस अधिका-याने चौकशी केली आणि अखेर त्याला 'चाईल्डलाइन' या संस्थेत पाठवले. 
' आम्ही रमझानला पाकिस्तानात त्याच्या आईकडे पोचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण भारतातून पाकिस्तानला जाण्यापेक्षा, बांग्लादेशमधून तेथे जाणे अधिक सोपे आहे' असेही सहाय म्हणाल्या.