शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

गीतानंतर पाकिस्तानच्या 'रमझान'चीही होणार घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 10:00 IST

भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ७ - १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या गीताचा ईधी फांऊडेशनच्या बिल्किस ईधींनी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करून तिला गेल्या वर्षी सुखरूपरित्या मायदेशात पाठवले. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे. रमझानचे वडील काही वर्षांपासून बांग्लादेशमध्ये राहत असून त्याला तेथेच पाठवण्यात येईल. 
'रमझान कोलतकात्याला रवाना झाला असून तेथून सनलाप या एनजीओच्या मदतीने त्याला बांगलादेशमध्ये त्याच्या वडिलांकडे धाडण्यात येईल' असे 'उमीद' या आश्रयघराच्या प्रमुख अर्चना सहाय यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून रमझान तेथेच रहात होता. 
रमझान १० वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला बांग्लादेशला घेऊन गेले आणि त्याची आईशी ताटातूट झाली. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर रमजानची सावत्र आई त्याचा छळ करू लागली, या परिस्थितीला कंटाळून पाकिस्तानला आईकडे परत जाण्यासाठी रमझानने २०११ साली बांग्लादेशमधून पळ काढला आणि चुकून सीमा ओलांडून भारतात आला. अनेक राज्यात भटकलेल्या रमझानची २०१३ साली भोपाळ रेल्वे स्थानकावर एका रेल्वे पोलिस अधिका-याने चौकशी केली आणि अखेर त्याला 'चाईल्डलाइन' या संस्थेत पाठवले. 
' आम्ही रमझानला पाकिस्तानात त्याच्या आईकडे पोचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण भारतातून पाकिस्तानला जाण्यापेक्षा, बांग्लादेशमधून तेथे जाणे अधिक सोपे आहे' असेही सहाय म्हणाल्या.