शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

गीतानंतर पाकिस्तानच्या 'रमझान'चीही होणार घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 10:00 IST

भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ७ - १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या गीताचा ईधी फांऊडेशनच्या बिल्किस ईधींनी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करून तिला गेल्या वर्षी सुखरूपरित्या मायदेशात पाठवले. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे. रमझानचे वडील काही वर्षांपासून बांग्लादेशमध्ये राहत असून त्याला तेथेच पाठवण्यात येईल. 
'रमझान कोलतकात्याला रवाना झाला असून तेथून सनलाप या एनजीओच्या मदतीने त्याला बांगलादेशमध्ये त्याच्या वडिलांकडे धाडण्यात येईल' असे 'उमीद' या आश्रयघराच्या प्रमुख अर्चना सहाय यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून रमझान तेथेच रहात होता. 
रमझान १० वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला बांग्लादेशला घेऊन गेले आणि त्याची आईशी ताटातूट झाली. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर रमजानची सावत्र आई त्याचा छळ करू लागली, या परिस्थितीला कंटाळून पाकिस्तानला आईकडे परत जाण्यासाठी रमझानने २०११ साली बांग्लादेशमधून पळ काढला आणि चुकून सीमा ओलांडून भारतात आला. अनेक राज्यात भटकलेल्या रमझानची २०१३ साली भोपाळ रेल्वे स्थानकावर एका रेल्वे पोलिस अधिका-याने चौकशी केली आणि अखेर त्याला 'चाईल्डलाइन' या संस्थेत पाठवले. 
' आम्ही रमझानला पाकिस्तानात त्याच्या आईकडे पोचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण भारतातून पाकिस्तानला जाण्यापेक्षा, बांग्लादेशमधून तेथे जाणे अधिक सोपे आहे' असेही सहाय म्हणाल्या.