शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

पाऊस कमी पडताच, कर्नाटक-तामिळनाडूत सुरू होते भांडण

By admin | Updated: September 12, 2016 01:18 IST

मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात चांगला हजेरी लावतो तेव्हा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत कावेरीच्या पाणी वाटपावरून चकार शब्दानेही वाद समोर येत नाही.

बंगळुरू : मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात चांगला हजेरी लावतो तेव्हा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत कावेरीच्या पाणी वाटपावरून चकार शब्दानेही वाद समोर येत नाही. परंतु जेव्हा कावेरीच्या धरण क्षेत्रात कमी पाऊस पडतो व कावेरीच्या खोऱ्यातील चार महत्त्वाच्या जलाशयांमध्ये त्यांच्या धरण क्षमतेपेक्षाही कमी पाणी असते त्यावेळी मात्र ही दोन राज्ये पाणी वाटपावरून एकमेकांशी भांडतात.

यावर्षी दक्षिण कर्नाटकच्या अनेक भागांत पाऊस साधारण प्रमाणापेक्षा ४० टक्के जास्त झाला. तथापि, कावेरी नदीच्या कोदगु जिल्ह्यातील मुख्य धरणक्षेत्रात तो सामान्य प्रमाणाच्याही ३३ टक्के कमीच झाला. पर्यायाने कावेरी नदी खोऱ्याच्या कर्नाटकातील कृष्णराज सागर, हरंगी, हेमवती आणि काबिनी जलाशयात पाणी कमी आले. आज त्यांच्यातील सगळे पाणी आॅगस्टअखेर केवळ ११४.६६ हजार दशलक्ष क्युबिक फूट आहे. त्यांच्यात ते सामान्यत: २१५.७० टीएमसी फूट असते. कर्नाटकातील या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने आपल्या राज्याच्या तंजावूर भागातील शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आॅगस्टमध्ये कर्नाटकविरोधात तक्रार केली. पाच फेबु्रवारी २००५ रोजी कावेरी जल विवाद लवादाने सामान्य पाऊस झाल्यानंतर पाणी सोडण्याची योजना काय असावी याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन कर्नाटकने केले नाही अशी तमिळनाडूची तक्रार होती.

तंजावूर भागातील सांबामध्ये आॅगस्ट ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. पाच सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला त्याने देखरेख ठेवणाऱ्या समितीकडे दाद मागण्याचा आदेश दिला. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यावर कावेरीच्या पाणी वाटपाचा निर्माण होणारा वाद कसा सोडवायचा यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. हा आदेश देताना न्यायालयाने शेतकऱ्यांचे पाण्यावाचून होणारे हाल बघता दहा दिवसांसाठी कर्नाटकने रोज १५ हजार क्युसेक पाणी तमिळनाडूला सोडावे असा हंगामी आदेश दिला. त्यामुळे पुन्हा संघर्ष सुरू झाला. (वृत्तसंस्था)कर्नाटकची सर्वोच्च न्यायालयात याचिकानवी दिल्ली : कावेरी नदीतून तामिळनाडूला दररोज १५ हजार क्युसेक्सऐवजी एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्याची परवानगी मागणारी याचिकी शनिवारी सायंकाळी कर्नाटकन सर्वोच्च न्यायालयात केली. तिच्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कर्नाटकने तामिळनाडूला दररोज १५ हजार क्युसेक्स पाणी दहा दिवस कावेरी नदीतून सोडावे, या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा करण्याचीही विनंती कर्नाटकने या याचिकेत केली आहे. तामिळनाडूला पाणी सोडावे लागत असल्यामुळे राज्यात आंदोलन सुरू झाले असून, त्यात राज्याचे दररोज ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.