शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

वेतन आयोगानंतर कामचुकारांना नारळ!

By admin | Updated: June 19, 2017 02:54 IST

सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ दिल्यानंतर आता त्या पगाराला साजेसे दर्जेदार काम करा अन्यथा घरी जाण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट संकेत

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ दिल्यानंतर आता त्या पगाराला साजेसे दर्जेदार काम करा अन्यथा घरी जाण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट संकेत देत केंद्र सरकारने आपल्या सेवेतील हजारो अधिकाऱ्यांच्या कामगिरीची समीक्षा सुरू केली आहे. यात जे पूर्वनिर्धारित क्षमता पातळीपर्यंत नसल्याचे आढळतील त्यांचा बोजा यापुढे तिजोरीवर न टाकण्याचा कठोर पवित्रा सरकारने घेतला असल्याचे कळते.केंद्र सरकारच्या ४८.८५ लाख कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने सातव्या वेतन आयोगानुसार सरासरी २३ टक्के पगारवाढ लागू झाली. वेतन आयोगाने वेतनवाढीसोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाज गुणवत्तेची समीक्षा करण्याचीही शिफारस केली होती. थोडक्यात वेतन आणि कामाचा दर्जा यांची सांगड घालण्यात आली होती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचा त्यांच्या सेवाकाळात १५ व २५ वर्षांनंतर आढावा घेतला जाणे हे नवे नाही. तसा नियम पूर्वीपासूनच आहे. मात्र वेतन आयोग लागू केल्यानंतर लगेचच सरकारने हे काम ज्या मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे त्यावरून सरकारी सेवांमधील चुकार आणि सुमारांना यापुढे ‘चलता है’ अशा बेफिकिरीने नोकरी गृहित धरता येणार नाही, असा स्पष्ट संकेत मिळतो.गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने कामात सुमार व चुकार असलेल्या आयएस व आयपीएस अधिकाऱ्यांसह १२९ कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले आहे, हेही पुरेसे बोलके आहे.दर्जा न गाठणाऱ्यांवर होणार कारवाईकार्मिक मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने सध्या केंद्रीय सेवेतील ६७ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची समीक्षा हाती घेतली आहे. यात ‘आयएएस’, ‘आयपीएस’ व ‘आयआरएस’ अशा ‘अ’ वर्गीय सेवेतील सुमारे २५ हजार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.या सूत्रांनुसार या समीक्षेत जे अधिकारी व कर्मचारी अपेक्षित गुणवत्ता व दर्जा गाठू शकत नसल्याचे आढळतील त्यांना त्याबद्दल नियमानुसार दंडित केले जाईल.प्रामाणिकता, कार्यक्षमतेची कदरयासंदर्भात कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, मोदी सरकारने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिक लाभ व सवलती देतानाच त्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याचीही सुनिश्चित व्यवस्था ठरविली आहे. उच्चदर्जाची कार्यक्षमता व भ्रष्टाचारमुक्त शासन यावर मोदी सरकारचा भर आहे.प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनुकूल वातावरण तयार व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. कामचुकार, भ्रष्ट यांच्यावरील दंडात्मक कारवाईचे नेमके स्वरूप काय असेल, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.