शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वेतन आयोगानंतर कामचुकारांना नारळ!

By admin | Updated: June 19, 2017 02:54 IST

सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ दिल्यानंतर आता त्या पगाराला साजेसे दर्जेदार काम करा अन्यथा घरी जाण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट संकेत

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ दिल्यानंतर आता त्या पगाराला साजेसे दर्जेदार काम करा अन्यथा घरी जाण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट संकेत देत केंद्र सरकारने आपल्या सेवेतील हजारो अधिकाऱ्यांच्या कामगिरीची समीक्षा सुरू केली आहे. यात जे पूर्वनिर्धारित क्षमता पातळीपर्यंत नसल्याचे आढळतील त्यांचा बोजा यापुढे तिजोरीवर न टाकण्याचा कठोर पवित्रा सरकारने घेतला असल्याचे कळते.केंद्र सरकारच्या ४८.८५ लाख कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने सातव्या वेतन आयोगानुसार सरासरी २३ टक्के पगारवाढ लागू झाली. वेतन आयोगाने वेतनवाढीसोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाज गुणवत्तेची समीक्षा करण्याचीही शिफारस केली होती. थोडक्यात वेतन आणि कामाचा दर्जा यांची सांगड घालण्यात आली होती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचा त्यांच्या सेवाकाळात १५ व २५ वर्षांनंतर आढावा घेतला जाणे हे नवे नाही. तसा नियम पूर्वीपासूनच आहे. मात्र वेतन आयोग लागू केल्यानंतर लगेचच सरकारने हे काम ज्या मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे त्यावरून सरकारी सेवांमधील चुकार आणि सुमारांना यापुढे ‘चलता है’ अशा बेफिकिरीने नोकरी गृहित धरता येणार नाही, असा स्पष्ट संकेत मिळतो.गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने कामात सुमार व चुकार असलेल्या आयएस व आयपीएस अधिकाऱ्यांसह १२९ कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले आहे, हेही पुरेसे बोलके आहे.दर्जा न गाठणाऱ्यांवर होणार कारवाईकार्मिक मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने सध्या केंद्रीय सेवेतील ६७ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची समीक्षा हाती घेतली आहे. यात ‘आयएएस’, ‘आयपीएस’ व ‘आयआरएस’ अशा ‘अ’ वर्गीय सेवेतील सुमारे २५ हजार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.या सूत्रांनुसार या समीक्षेत जे अधिकारी व कर्मचारी अपेक्षित गुणवत्ता व दर्जा गाठू शकत नसल्याचे आढळतील त्यांना त्याबद्दल नियमानुसार दंडित केले जाईल.प्रामाणिकता, कार्यक्षमतेची कदरयासंदर्भात कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, मोदी सरकारने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिक लाभ व सवलती देतानाच त्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याचीही सुनिश्चित व्यवस्था ठरविली आहे. उच्चदर्जाची कार्यक्षमता व भ्रष्टाचारमुक्त शासन यावर मोदी सरकारचा भर आहे.प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनुकूल वातावरण तयार व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. कामचुकार, भ्रष्ट यांच्यावरील दंडात्मक कारवाईचे नेमके स्वरूप काय असेल, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.