शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

भारताच्या पराभवानंतर काश्मिरात फुटले फटाके

By admin | Updated: June 19, 2017 11:27 IST

काल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला दारुण पराभव पत्करावा लागल्याने देशभरात दु:ख आणि निराशेचे वातावरण आहे. मात्र भारतीय संघाच्या

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 19 - काल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला दारुण पराभव पत्करावा लागल्याने देशभरात दु:ख आणि निराशेचे वातावरण आहे. मात्र भारतीय संघाच्या पराभवाने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांना आपल्या भारतद्वेशाला मोकळी वाट करून देण्याची संधी मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा विजय झाल्यावर फुटिरतावाद्यांनी फटाके फोडून जल्लोश केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत., त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. 
श्रीनगरमध्ये तरुणांनी फटाके फोडून पाकिस्तानचे झेंडे फडकवून आनंद साजरा केला. भारतविरोधी घोषणाबाजीही केली. श्रीनगरमधील फतेहकदाल, साकीदफर आणि अनंतनाग येथे पोलिस आणि लष्कराच्या तळांवर फटाके फेकणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 
त्रालमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विजयानंतर महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोश साजरा केला. त्रालमधील प्रत्येक गावात विजयानिमित्त मिरवणुका निघाल्याचेही वृत्त आहे. शोपियाँ  आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे समजते. पण याला दुजोरा मिळू शकलेला नाही.  
( विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला! )
 
काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत फखर झमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४ बाद ३३८ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ३०.३ षटकांत १५८ धावांत गुंडाळला. भारतीय डावात हार्दिक पांड्याचा (७६ धावा, ४३ चेंडू, ४ चौकार, ६ षट्कार) अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.
( भारताच्या पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयाची ही आहेत कारणे )