शीलेश शर्मा - नवी दिल्ली
भाजपाच्या नेतृत्वातील मोदी सरकारने राज्यपाल हटाव मोहिमेनंतर आता अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांमधील उच्चपदस्थ अधिका:यांना पदमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
याच शृंखलेत आज गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे उपाध्यक्ष शशिधर रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी रेड्डी यांना सरकारची इच्छा बोलून दाखविताच त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता लगेच राजीनामा देऊन टाकला. महत्त्वाच्या पदांवरून हटविल्या जाणा:या अधिका:यांच्या यादीत एकटे शशिधर रेड्डीच नाहीत. भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. कर्णसिंह, महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा यांच्यासह अनेक आयोगांचे अध्यक्ष आणि नामनियुक्त सदस्यांचा यात समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कार्मिक मंत्रलयासह इतर सर्व मंत्रलयांना अशी यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. संपुआ सरकारने महत्त्वाच्या सरकारी आणि गैरसरकारी पदांवर नियुक्त केलेल्या लोकांच्या या यादीसोबतच त्यांचा आणखी किती कार्यकाळ शिल्लक आहे तसेच कशा पद्धतीने त्यांना पदमुक्त करता येईल याबाबतही सविस्तर माहितीही मागविण्यात आली आहे.
-या सर्व पदांवर आपल्या पसंतीचे लोक नियुक्त करण्याची सत्ताधारी भाजपाची मनीषा आहे.
-सरकारच्या या कवायतीनंतर काही राज्यपालांनी पद सोडले असले तरी अनेक राज्यपाल सहजासहजी पद सोडण्यास राजी नाहीत.
-उलट न्यायालयात दाद मागण्याच्या दृष्टीने कायदेशीर सल्लामसलत करीत आहेत.
-यात महाराष्ट्र, केरळ आणि बंगालचे राज्यपाल आहेत.