शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र

By admin | Updated: April 27, 2017 12:51 IST

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. 
 
बुधवारी संध्याकाळी पार्टीचे दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे यांनी राजीनामा दिला होता तर गुरुवारी सकाळी अन्य नेत्यांनी आपले राजीनामे सुपुर्द करण्यास सुरुवात केली आहे. 
 
विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.  
(आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय)
 
सिंह यांच्याव्यतिरिक्त दिल्लीचे प्रभारी आशिष तलवार यांनीही दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत "आप"च्या झालेल्या पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. 
पंजाबमधील पार्टीचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांनीही आपल्या पदाची राजीनामा दिला आहे. "मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. देशात आणखी चांगल्या सुधारणा आणण्यासाठी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नियमित काम करत राहणार", अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.
 
तर दुसरीकडे, दिल्ली मनपा निवडणुकीचे निकाल हाती येताच आमदार अल्का लांबा यांनी आपला राजीनामा सादर केला होता. त्यांच्या मतदारसंघातील तिन्ही प्रभागांमध्ये पार्टीचा पराजय झाल्यानं त्यांनी आपला आपला राजीनामा सादर केला होता. 
 
पंजाबमधील "आप"चे प्रभारी संजय सिंह, दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे असोत किंवा दुर्गेश पाठक ही सर्व नेतेमंडळी अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळील असल्याचे मानले जाते. या नेत्यांना पंजाब विधानसभा निवडणूक आणि दिल्लीतील मनपा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती.  मात्र या निवडणुकांमध्ये आपचा सुपडा साफ झाला.
 
यादरम्यान, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर पंजाबमध्ये तिकीट वाटपाचा आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सर्व नेत्यांवर विश्वास होता. 
 
मात्र, दिल्ली मनपा निवडणुकीतील "आप"चा दणदणीत पराभव पाहता पार्टीतील वाद तसंच असंतोष टाळण्यासाठी आता आपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.