शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र

By admin | Updated: April 27, 2017 12:51 IST

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. 
 
बुधवारी संध्याकाळी पार्टीचे दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे यांनी राजीनामा दिला होता तर गुरुवारी सकाळी अन्य नेत्यांनी आपले राजीनामे सुपुर्द करण्यास सुरुवात केली आहे. 
 
विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.  
(आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय)
 
सिंह यांच्याव्यतिरिक्त दिल्लीचे प्रभारी आशिष तलवार यांनीही दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत "आप"च्या झालेल्या पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. 
पंजाबमधील पार्टीचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांनीही आपल्या पदाची राजीनामा दिला आहे. "मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. देशात आणखी चांगल्या सुधारणा आणण्यासाठी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नियमित काम करत राहणार", अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.
 
तर दुसरीकडे, दिल्ली मनपा निवडणुकीचे निकाल हाती येताच आमदार अल्का लांबा यांनी आपला राजीनामा सादर केला होता. त्यांच्या मतदारसंघातील तिन्ही प्रभागांमध्ये पार्टीचा पराजय झाल्यानं त्यांनी आपला आपला राजीनामा सादर केला होता. 
 
पंजाबमधील "आप"चे प्रभारी संजय सिंह, दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे असोत किंवा दुर्गेश पाठक ही सर्व नेतेमंडळी अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळील असल्याचे मानले जाते. या नेत्यांना पंजाब विधानसभा निवडणूक आणि दिल्लीतील मनपा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती.  मात्र या निवडणुकांमध्ये आपचा सुपडा साफ झाला.
 
यादरम्यान, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर पंजाबमध्ये तिकीट वाटपाचा आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सर्व नेत्यांवर विश्वास होता. 
 
मात्र, दिल्ली मनपा निवडणुकीतील "आप"चा दणदणीत पराभव पाहता पार्टीतील वाद तसंच असंतोष टाळण्यासाठी आता आपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.