शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र

By admin | Updated: April 27, 2017 12:51 IST

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. 
 
बुधवारी संध्याकाळी पार्टीचे दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे यांनी राजीनामा दिला होता तर गुरुवारी सकाळी अन्य नेत्यांनी आपले राजीनामे सुपुर्द करण्यास सुरुवात केली आहे. 
 
विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.  
(आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय)
 
सिंह यांच्याव्यतिरिक्त दिल्लीचे प्रभारी आशिष तलवार यांनीही दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत "आप"च्या झालेल्या पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. 
पंजाबमधील पार्टीचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांनीही आपल्या पदाची राजीनामा दिला आहे. "मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. देशात आणखी चांगल्या सुधारणा आणण्यासाठी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नियमित काम करत राहणार", अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.
 
तर दुसरीकडे, दिल्ली मनपा निवडणुकीचे निकाल हाती येताच आमदार अल्का लांबा यांनी आपला राजीनामा सादर केला होता. त्यांच्या मतदारसंघातील तिन्ही प्रभागांमध्ये पार्टीचा पराजय झाल्यानं त्यांनी आपला आपला राजीनामा सादर केला होता. 
 
पंजाबमधील "आप"चे प्रभारी संजय सिंह, दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे असोत किंवा दुर्गेश पाठक ही सर्व नेतेमंडळी अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळील असल्याचे मानले जाते. या नेत्यांना पंजाब विधानसभा निवडणूक आणि दिल्लीतील मनपा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती.  मात्र या निवडणुकांमध्ये आपचा सुपडा साफ झाला.
 
यादरम्यान, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर पंजाबमध्ये तिकीट वाटपाचा आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सर्व नेत्यांवर विश्वास होता. 
 
मात्र, दिल्ली मनपा निवडणुकीतील "आप"चा दणदणीत पराभव पाहता पार्टीतील वाद तसंच असंतोष टाळण्यासाठी आता आपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.