शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

१५ वर्षानंतर आसाम मध्ये भाजपा मारणार बाजी - एग्झिट पोल

By admin | Updated: May 17, 2016 08:53 IST

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज पुर्ण झाला असून, निवडणुकांचे एग्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. यात आसाममध्ये भाजपा बाजी मारणार असल्याचे चित्र आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि १६.  - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला असून, निवडणुकांचे एग्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. यात आसाममध्ये भाजपा बाजी मारणार असल्याचे चित्र आहे. १५ वर्षानंतर आसाममध्ये भाजपा सत्तेवर येणार असल्याचे संकेत टाइम्स नाऊच्या सर्वेच्या एग्झिट पोलने दिले आहेत.  त्याचप्रमाणे एबीपी न्यूज, टुडे चाणक्य, सी व्होटर, इंडिया टुडे यांनी देखील आपले एग्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. टाइम्स नाऊच्या सर्वेनुसार आसाममध्ये काँग्रेस 34 जागावर, भाजपा आणि मित्रपक्ष 76 जागावर, AIUDF 12 आणि इतर ४ जागावर निवडूण येण्याची शक्याता वर्तवली आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, एम करुणानिधी आणि व्ही.एस.अच्युतानंदन हे प्रमुख नेते निवडणूक रिंगणात आहेत. तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे. 
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३३ जागांसाठी ३,७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२० महिला आहेत. ५.८२ कोटी मतदारांकडे मतदानाचा अधिकार आहे. केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठी १२०३ उमेदवार रिंगणात आहेत. यात १०९ महिला आहेत. 
पुडूच्चेरीमध्ये दोन काँग्रेसपक्षांमध्येच लढत आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एन.रंगासॅमी यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. पुडूच्चेरीमध्ये तीस जागांसाठी ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. यात २१ महिला आहेत. 
 
 
एक्सिसच्या सर्वेनुसार निवडणूक झालेल्या ५ ही राज्यातील एग्झिट पोल
 
एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार
आसाममध्ये कांग्रेस 33, 
BJP गठबंधन 81,
AIUDF 10 
इतर २ जागा
 
टुडे चाणक्यच्या सर्वेनुसार प. बंगालमध्ये
 TMC 210,
लेफ्ट गठबंधन 70, 
बीजेपी 14,
 इतर ०० जागा
 
 
सी व्होटरच्या एग्झिट पोलनुसार, तमिळनाडूत जयललिता पुन्हा सत्तेवर येणार
डीएमकेला 124-140 जागा
 
इंडिया टुडेच्या सर्वेनुसार केरळमध्ये
 UDF 38-48,
 LDF 88-101, 
BJP गठबंधन 0-3,
अन्य पार्टीला 1-4 जागा 
 
इंडिया टुडे सर्वे प. बंगाल 
 TMC  243 , 
लेफ्ट गठबंधन 45, 
BJP को 3 
इतर 3